
Dharmpuri News : रानडुकरांपासून आपले पीक वाचवण्यासाठी एका शेतकऱ्याने लावलेल्या कुंपणाने तीन हत्तींणींचा जीव घेतल्याचा (Elephant Death) प्रकार समोर आला आहे. एका शेतकऱ्याने विजेचे बेकायदा कुंपण घातले होते.
मंगळवारी तीन हत्तींणी हेच कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना विजेचा धक्का बसला आणि त्यांचा मृत्यू झाला.
तामिळनाडूतील धर्मपुरी जिल्ह्यातील मरंदहल्ली येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. दरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बेकायदा विद्युत कुंपण बसवल्याप्रकरणी संबंधित शेतकऱ्याला अटक केली आहे.
मुरुगन असे शेतकऱ्याचे नाव असून त्याने रानडुकरांचे हल्ले रोखण्यासाठी बेकायदा वीज कुंपण लावले होते. यादरम्यान शेत ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना हत्तीणी वीज तारांच्या संपर्कात आल्या आणि विजेच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी शेतमालक मुरुगन याला पोलिसांनी अटक केली आहे. तामिळनाडू जनरेशन अँड डिस्ट्रीब्युशन कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना तत्काळ दक्ष करण्यात आले, त्यांनी वीज कनेक्शन तोडले.
वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन हत्तीणींचे वय सुमारे ३० वर्षे आहे. वन अधिकाऱ्यांनी सांगितले की, विभाग अंदाजे नऊ महिन्यांच्या शावकांना इतर कळपांसह पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.