
Shevagav News : अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची तातडीने मदत देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांकडून दिले जात आहे. मात्र गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पडलेल्या अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
त्या नुकसानीची मदत सरकारने जाहीर केली होती. परंतु, सहा महिने होत आले तरीही शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यामुळे संकटात सापडलेला शेतकरी हताश झाला आहे. अश्वासने पुरे, आता मदत कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी दहिगाव-ने परिसरात ऑक्टोबरमध्ये पडलेल्या अतिवृष्टीत कापूस, सोयाबीन, तूर, मका आदी पिके झोडपल्यानंतर कशीबशी जगलेली पिके हातात आली होती.
मात्र, कापसाचे भाव गडगडल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे. आता पुन्हा रब्बीचा घास निसर्ग हिरावून घेत असल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकरी आता हाताश झाला आहे. मदत जाहीर करूनही ती मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.