
Dhule News ः शिंदखेडा तालुक्यात ४ व ५ मार्चला वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान (Crop Damage) झाले आहे.
यात मका, गहू, हरभरा, दादर, ज्वारी, केळी, पपई आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असून, शासनस्तरावर शेतीच्या पिकांचे पंचनामे महसूल व कृषी विभागाच्या संयुक्तरीत्या करण्यात यावेत तशा एकत्रित अहवाल शासनास सादर करावा व शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई मिळावी यासाठी शिंदखेड्यात शेतकरी संघर्ष समितीतर्फे मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले, की शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. म्हणून शेतकरी हवालदिल झाला आहे.
शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई मिळावी, अन्यथा शेतकरी संघर्ष समिती यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेतकरी जनआंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला. यास सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील.
निवेदनाची प्रत तहसीलदारंमार्फत मुख्यमंत्र्यांना रवाना करण्यात आली. या वेळी शेतकरी संघर्ष समितीचे तसेच पीक संरक्षण संस्थेचे अध्यक्ष विजय चौधरी, उपाध्यक्ष योगेश देसले, संचालक अरुण पाटील, दिलीप पाटील, बन्सीलाल बोरसे, कैलास पाटील, दत्तात्रय देसले, अशोक परदेशी, गजानन भामरे, यादव प्रेमराज मराठे, विलास मोरे, मीनाबाई पाटील, इंदूबाई मराठे, गणपत देसले, संजय बडगुजर, सचिव मनोहर भामरे आदींसह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.