Unseasonal Rain News : आठवडाभरापासून तालुक्यात ढगाळ वातावरण (Cloudy Weather) आहे. मंगळवारी सकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने आंबा, काजू, कडधान्य पीक धोक्यात आले आहे. वीटभट्टी व्यावसायिकांचेही मोठे नुकसान झाले असून गुरांचे वैरणही भिजले आहे.
लांबलेल्या पावसाने वीटभट्टी व्यवसाय यंदा उशिराने सुरू झाला. ढगाळ वातावरणामुळेही मातीच्या वीटा सुकण्यास विलंब लागला. त्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळीने वीटभट्टीमालक चिंतेत आहेत.
बदलत्या हवामानाचा आंबा, काजूच्या उत्पादनाला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी मोहर गळला आहे. तर पावसामुळे फळगळती झाली आहे. शेतकऱ्यांनी माच करून ठेवलेली वैरण भिजली असून गुरांच्या दाणा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रब्बी हंगामातील कडधान्ये भिजली असून काढणी व झोडणी लांबणीवर केली आहे. पिके बाधित झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरही परिणाम होणार आहे. रेवदंड्यातील काही भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. लालपरीचे वेळापत्रक कोलमडले. मुख्य रस्त्यावर वाहने घसरण्याचे किरकोळ प्रकार घडले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.