
Ratnagiri News : गेल्या काही दिवसांमध्ये तापमान कमालीचे वाढले आहे. त्याचा आंबा-काजू पिकावर (Mango, Cashew Crop) परिणाम झाला असून फळ भाजण्यासह फळगळतीचे प्रमाण वाढले आहे.
तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील नाटे, आडीवरे़ नाणार, साखर यासह आजूबाजूच्या परिसरातील आंबा बागांमध्ये फळगळती आणि आंबा फळ भाजण्याचे प्रमाण अधिक आहे.
आधीच आंबा-काजू बागायतदारांच्या खर्च-उत्पन्नाचे गणित यावर्षी बिघडलेले असताना तापमान वाढीमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीचे चटके बागायतदारांना सहन करावे लागत आहेत.
जिल्ह्यात तापमान वाढत आहे. उन्हाच्या झळ्या अधिकच असह्य होत आहेत. त्याचा प्रतिकूल परिणाम कोकणातील आंबा, काजू पिकावर होत आहे.
ज्या बागांमधील झाडांना सुरुवातीला मोहोर येऊन फळधारणा झाली आहे, त्या बागांमध्ये फळे परिपक्व होऊन काढणीच्या स्थितीत आहेत.
अनेक बागांमधील झाडांवर अर्धवट भाजलेल्या स्थितीत तयार फळे दिसत आहेत. तर, काही झाडांच्या बुंध्याखाली फळे गळून गेली आहेत. वाढत्या तापमानामुळे फळगळती होऊन बागायतदारांना आर्थिक नुकसानीचे चटके सहन करावे लागणार आहेत.
तालुक्याच्या पश्चिम भागांमधील बागांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. उशिरा मोहोर, तुडतुड्यांचे जास्त प्रमाण, प्रतिकूल हवामान याला तोंड देत आंबा टिकविण्यासाठी बागायतदारांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे.
मिळणाऱ्या उत्पन्नातून कीटकनाशक फवारणीसह मशागती आणि कामगारांसाठी करण्यात येणारा खर्च भागविणेही मुश्किल आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.