
Jalgaon News : ग्रामसेवक केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना (Central, State Government Scheme) ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोचवून गरजूंना लाभ देण्याचे काम करीत असल्याने ग्रामीण विकासामध्ये ग्रामसेवकाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.
ग्रामसेवक (Gramsevak) व सरपंचांनी (Sarpanch) कर्तव्य भावनेतून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शकपणे काम करावे, असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी शनिवारी (ता. ४) येथे केले.
येथील नियोजन सभागृहात ग्रामविकास विभाग, जिल्हा परिषदेतर्फे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा व सुजल, समृद्ध जळगाव अभियानाच्या (डासमुक्त जळगाव) प्रारंभाप्रसंगी ते बोलत होते. ग्रामविकास व पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याणमंत्री गिरीश महाजन अध्यक्षस्थानी होते.
खासदार उन्मेष पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ. पंकज आशिया, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाबूलाल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील आदी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, की पुरस्कार मिळाल्याने पुरस्कारार्थ्यांची जबाबदारी अधिक वाढली आहे. आपण करीत असलेल्या कामाचे आपल्याला समाधान वाटले पाहिजे, असे काम सर्वांच्या हातून घडावे. जळगाव जिल्हा डासमुक्त करण्याचा संकल्प करावा.
ग्रामविकासमंत्री महाजन म्हणाले, की ग्रामसेवक व तलाठी ग्रामीण भागाच्या विकासाची दोन चाके आहेत. ग्रामीण भागाच्या विकासात ग्रामसेवकाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. शासनाच्या योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी स्वतःहून पुढाकार घ्यावा, असेही महाजन म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.