
Mumbai News : सर्वसामान्य गृहिणींच्या, नागरिकांच्या दररोजच्या वापरासाठी लागणाऱ्या गॅसच्या दरात दररोज वाढ होत आहे; तर काही दिवसांपूर्वी डिझेल, पेट्रोलचे भाव वाढले आहेत; तर गरिबांचे इंधन म्हणून वापरले जाणारे रॉकेल दिसेनासे झाले आहे.
या इंधन दरवाढ आणि सतत होणाऱ्या गॅसच्या दरवाढीमुळे (Gas Hike Rate) ‘आम्ही जगायचे तरी कसे’ असा सवाल दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींमधून विचारला जात आहे.
महागाईत वाढ झाल्यामुळे गृहिणींना त्याचे महिन्याचे घराचे बजेट सांभाळणे कठीण झाले आहे. अशात दुर्गम भागात रोजगाराचे पर्याय उपलब्ध नसल्याने आदिवासी बांधवांना आपले घर चालवण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
अशात नुकतेच गॅसच्या दरात वाढ करण्यात आली. त्यामुळे सध्या घरगुती गॅस सिलिंडरसाठी ११०० रुपयांना मिळत आहे; तर इंधनाच्या दरवाढीमुळे सर्वच वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत.
गॅसदरवाढीमुळे पुन्हा चुली पेटल्या
ग्रामीण भागात नागरिकांना उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस मिळाले होते, पण गॅसच्या किमती वाढल्याने ८० टक्के गरीब कुटुंबे गॅस वापरत नाहीत. ही कुटुंबे पुन्हा लाकूडफाटा गोळा करून चुलीचा वापर करू लागली आहेत.
मजुरी करणाऱ्यांना रोज ३०० ते ४०० रुपये मजुरी मिळते. पण गोडेतेल, मसाले, डाळी आदी जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडल्यामुळे शासनाने महागाई कमी करावी, अशी मागणी केली जाते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.