
बदलत्या वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आधीच संकटात सापडला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने द्राक्ष बागा वाचविण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. अशातच सांगली जिल्ह्यात द्राक्ष बागेवर वटवाघुळांनी हल्ला चढवला आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा परिसरात सुमारे अडीच ते तीन हजार एकर क्षेत्रात द्राक्ष पीक घेतले जाते. या ठिकाणी अनेक शेतकरी निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन घेतात. पण वटवाघुळांमुळे गेल्या काही दिवसापासून द्राक्ष बागांचे आतोनात नुकसान होत आहे. वटवाघुळांचे थवे रात्रीतून पिकावर हल्ला करतात. त्यामुळे सकाळी द्राक्ष बागेत द्राक्ष मण्यांचा सडा पडतो. या वटवाघुळांचा बंदोबस्त करण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी अनेक उपाय केले. पण एकही उपाय या वटवाघुळांना लागू पडत नव्हता.
वटवाघुळ टोकदार चोचीने द्राक्ष मणी अर्धवट खातात तसेच घड हालल्यामुळे निम्म्यापेक्षा जास्त द्राक्षमणी खाली पडल्यामुळे खराब होतात. त्यामुळे बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे टाळण्यासाठी अनेक शतेकऱ्यांनी जास्त व्होल्टचे बल्ब बागेत लावले. हा उपाय जास्त खर्चीक असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना परवडण्यासारखा नव्हता. फटाके लाऊन वटवाघळांना हुसकावून लावण्याचा प्रयोग झाला पण या उपायानेही वटवाघुळ काय धजेनात. त्यामुळे कमी खर्चात वटवाघुळापासून बागेला कसं वाचवता येईल याचा प्रत्येक द्राक्ष उत्पादक विचार करत होता. यातून एक नामी उपाय समोर आला. वाटवाघुळांचा बंदोबस्त करण्यासाठी मासे पकडण्याच्या जाळीचा उपयोग केला. ही जाळी पुर्ण बागेवर टाकून वटवाघूळ बागेत प्रवेश करणार नाहीत याची काळजी घेतली आणि हा उपाय लागू पडला. माशांची जाळी बागेवर टाकण्याचा जुगाड चांगलाच फायद्याचा ठरला आणि द्राक्ष बागेचे होणारे नुकसान वाचले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.