
Water Theft Mumbai News : तालुक्यातील सगळ्यात मोठे धरण (Dam) असलेल्या पाली-भुतिवली धरणातून (Pali-Bhutivali Dam) बेकायदा पाणी उपसा होत असल्याची बाब समोर आली आहे. त्यानंतर पाटबंधारे (Irrigation Department) विभागाने तोंडी सूचना दिल्याचे सांगण्यात आले असले तरी अजूनही पाणीचोरी सुरूच असल्याचे दिसून येत आहे.
धरणात थेट पंप लावून उपसा करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. तक्रार करूनही पाटबंधारे विभाग कारवाई करीत नसल्याने पाणीचोरांचे चांगलेच फावते आहे.
कर्जत तालुक्यातील रेल्वे पट्ट्यातील पाणीटंचाई दूर व्हावी आणि तेथील अधिकाधिक जमीन ओलिताखाली यावी म्हणून शासनाच्या पाटबंधारे विभागाने काही वर्षांपूर्वी पाली-भुतिवली धरणाची निर्मिती केली.
मात्र सध्या हे धरण पाणी चोरांच्या निशाण्यावर असून थेट जलवाहिन्या टाकून दिवसाढवळ्या पाण्याची चोरी केली जात आहे.
सध्या तेथील ग्रामपंचायत धरणातून पाझरणाऱ्या पाण्यावर योजना राबवत आहे. मात्र परिसरातील बांधकाम व्यावसायिकांकडून दिवसरात्र तीन ते चार पंपाद्वारे पाणीउपसा केला जात आहे.
रायगड लघु पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या मोऱ्या कालव्यांला पाणी मिळावे म्हणून धरण परिसरात ठेवण्यात आल्या होत्या. मात्र काही महिन्यांपूर्वी त्या फार्महाउस मालकांनी पळविल्या तर आता धरणाचे पाणी व्यावसायिकांकडून पळविले आहे.
तक्रार करूनही पाटबंधारे विभाग कारवाई करीत नसल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.
याबाबत माध्यमांनी वृत्त प्रसिद्ध केल्यावर संधारण विभागाच्या रायगड लघु पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांनी धरण परिसरात पाहणी केली होती.
त्यानंतर संबंधित पाणी उपसा करणाऱ्या व्यावसायिकांना चार दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र आज २२ दिवस उलटूनही कारवाई करण्यात आलेली नाही.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.