Crop Damage Survey In Akola : अकोला जिल्ह्यात नुकसानीच्या कामांना वेग

Crop Damage Update : अकोला जिल्ह्यात गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीट नुकसानीचे पंचनामे जोमाने सुरू आहेत.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Akola Crop Loss News : अकोला जिल्ह्यात गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीट नुकसानीचे पंचनामे जोमाने सुरू आहेत. आतापर्यंत बार्शीटाकळी तालुक्यात हे काम पूर्ण झाले असून इतर ठिकाणी वेगाने पंचनामे केले जात आहेत.

अवकाळी पावसामुळे जिल्हयात २६ व २७ एप्रिल रोजी पातूर, बाळापूर व बार्शीटाकळी तालुक्यातील ५६ गावांना फटका बसलेला आहे.तीन हजार ६६५ हेक्टरवरील पिके बाधित झाली. २८ ते ३० एप्रिल दरम्यान झालेल्या पावसामुळे अकोट, मूर्तिजापूर व बार्शीटाकळी तालुक्यातील ९०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे.

जिल्ह्यात मार्च व एप्रिल महिन्यात सातत्याने अवकाळी पाऊस झाला. मार्च महिन्यात ६ व ७ मार्च , ९ मार्च, तसेच १५ ते १९ मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपीट झाल्याने फळबागांसह रब्बी हंगामातील गहू व इतर पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला सुद्धा पावसाने धुमाकूळ घातलेला आहे.

Crop Damage
Crop Damage Survey : नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात

गारपिटीसह जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त क्षेत्राचे संयुक्त पंचनामे करण्यात आले. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसामुळे ९ हजार २६८.६८ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले.

दरम्यान एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवसात सुद्धा जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला होता. २६ व २७ एप्रिलला पातूर, बाळापूर व बार्शीटाकळी तालुक्यात पाऊस झाल्याने तीन हजार ६६५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद झालेली आहे. यामुळे सर्वाधिक नुकसान एकट्‍या पातूर तालुक्यात झाले.

२८ ते ३० एप्रिल दरम्यान ९०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. सदर नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्याचे काम सुरु असून अद्याप बार्शीटाकळी तालुक्याचे पंचनामे पूर्ण झाले आहे, तर इतर तालुक्यात काम सुरु आहे. २६ व २७ एप्रिलच्या अवकाळी पावसाने पातूर तालुक्यातील ३१ गावांना फटका बसला.

त्यासोबतच तीन हजार २३.५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. बाळापूर तालुक्यात अवकाळीमुळे एका गावातील १.५ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले. त्या प्रामुख्याने फळपिकाचा समावेश आहे. र्शीटाकळी तालुक्यातील २४ गावांमध्ये अवकाळीमुळे नुकसान झाले. ६४० हेक्टरवरील क्षेत्र या पावसामुळे बाधित झाले आहे.

२८ ते ३० एप्रिल दरम्यान झालेल्या पावसामुळे अकोट, मूर्तीजापूर व बार्शीटाकळी तालुक्यातील अंदाजे ९०० हेक्टरवरील पिके बाधित झालेली. यात ६९० शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. या आपत्तींचे पंचनामे यंत्रणांकडून सुरु आहेत. यात बार्शीटाकळी तालुक्याने पुढाकार घेत पंचनामे पूर्णत्वास नेले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com