Gadhinglaj Water Shortage : गडहिंग्लजमध्ये पाणी प्रकल्पांतील साठ्यात होतेय घट

Summer Season : वाढता उन्हाळा, वळीव पावसाचे प्रमाण कमी आणि जूनपर्यंत पावसाने ओढ देणार असल्याचा अंदाज या पार्श्‍वभूमीवर उपलब्ध पाणी वापरात काटकसर नाही झाल्यास ऐन उन्हाळ्यात उपसाबंदीच्या झळा शेतकऱ्‍यांना सोसाव्या लागणार आहेत.
Water shortage
Water shortage Agrowon

Kolhapur Water Scarcity News : वाढता उन्हाळा, वळीव पावसाचे प्रमाण कमी आणि जूनपर्यंत पावसाने ओढ देणार असल्याचा अंदाज या पार्श्‍वभूमीवर उपलब्ध पाणी वापरात काटकसर नाही झाल्यास ऐन उन्हाळ्यात उपसाबंदीच्या झळा शेतकऱ्‍यांना सोसाव्या लागणार आहेत. यामुळे शेतकऱ्‍यांना आतापासूनच जपून पाणी वापरावे लागणार आहे.

आजऱ्‍यातील चित्री आणि आंबेओहोळ या दोन मध्यम प्रकल्पातील पाण्यावर गडहिंग्लज तालुक्यातील शेती आणि पिण्याच्या पाणी योजना अवलंबून आहेत. दरवर्षी मार्चपासून काही वळीव पाऊस कोसळायचे. यंदा मात्र एप्रिल संपत आला तरी अपेक्षित असे वळीव झाले नाहीत.

परिणामी धरणातील पाण्याचाच वापर उसासह अन्य पिकांसाठी केला. त्यातच ऑक्टोबरनंतर अवकाळी पावसानेही पाठ फिरवल्याने धरणातील पाण्याचा विसर्ग डिसेंबर-जानेवारीतच सुरू करावे लागले. परिणामी यंदा अपेक्षेपेक्षा अधिक पाण्याचा वापर झाला आहे.

Water shortage
Vaan Water Project : शेतकरी पाणी परिषदेने भरला शेतकऱ्यांमध्ये हुंकार

चित्री व आंबेओहोळ प्रकल्पात असलेला साठा लक्षात घेता मे महिन्यात उपसाबंदीच्या झळा बसण्याची शक्यताही नाकारता येत नाही. जून अखेरपर्यंत पावसाळा लांबलाच तर उपलब्ध साठ्यातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवावा लागणार आहे.

याशिवाय तालुक्यातील नरेवाडी व करंबळी वगळता इतर चार लघू पाटबंधारे प्रकल्पामध्ये ५० टक्क्याच्या आत पाणीसाठा आहे. त्याचे काटेकोर नियोजन गरजेचे होणार आहे.

या प्रकल्पावरही पिण्याच्या पाण्याच्या योजना अवलंबून असल्याने साठा राखीव ठेवावा लागणार आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा (एमसीएफटीमध्ये)

प्रकल्पाचे नाव - पाणीसाठा - टक्केवारी

चित्री - ८३०- ४४

आंबेओहोळ- ६६९ - ५४

शेंद्री- ३२- ४९

वैरागवाडी- २५- ४८

करंबळी- ५६ - ५५

तेरणी - ५९- ४८

नरेवाडी ५२ ६७

येणेचवंडी - २१ - ३९

उपलब्ध पाणी लक्षात घेता चित्री व आंबेओहोळ धरण लाभक्षेत्रात उपसाबंदी लावावी लागणार नाही असे वाटते. परंतु वाढता उन्हाळा व पाण्याचा वापर काटकसरीने झाला नाही तर उपसाबंदी टळणार नाही. शेतकऱ्‍यांनी पाण्याचा वापर जपून करावा.
श्रीकांत पाटील, शाखा अभियंता, हिरण्यकेशी पाटबंधारे

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com