Satara News : बदलत्या हवामानाचा भाजीपाला व टरबूज पिकांना फटका बसला असून, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा झाला आहे.
तालुक्यात मागील आठवड्यापासून सतत झालेला जोरदार गाराचा पाऊस, तापमानात अचानक झालेली घट यामुळे करपा, भुरी, डाऊनी व थ्रीप्सचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
पारंपरिक पिकासोबतच तालुक्यातील पूर्वभागातील जांभुळणी, वळई, वरकुटे-मलवडी पट्ट्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक भाजीपाला व फळवर्गीय पिकांची लागवड वाढवली आहे.
कलिंगड, टोमॅटो, खरबूज, काकडी, शिमला मिरची या पिकांचे उन्हाळी क्षेत्र वाढले आहे. शिवाय हंगामी पीक म्हणून मेथी, कोंथिबिरीचीही लागवड तालुक्यात वाढत असल्याचे चित्र आहे.
मात्र काही दिवसांत ढगाळ वातावरण, चार दिवसांपूर्वी झालेला जोरदार पाऊस अन त्यातून बदललेले वातावरण यामुळे उन्हाळी पिकांना मोठा फटका बसला आहे.
ठिबक, मल्चिंग, खत, पाणी व्यवस्थापन, महागडी फवारणी करून जगवलेली पिके हवामान बदलाच्या फटक्याने हातचे जाण्याची वेळ आली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.