Crop Insurance : विमाधारक शेतकऱ्यांना परतावा मिळेना

हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेतून २०२१-२२ च्या हंगामात केळी पिकासाठी विमा कंपनीच्या पोर्टलवरील अनागोंदी, अनावधानाने आणि बँकांच्या चुकांमुळे काही शेतकऱ्यांनी चार हेक्टरवर विमा संरक्षण घेतले.
Crop Insurance
Crop Insurance Agrowon

Jalgaon News : हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेतून (Fruit Crop Insurance Scheme) २०२१-२२ च्या हंगामात केळी पिकासाठी विमा कंपनीच्या पोर्टलवरील अनागोंदी, अनावधानाने आणि बँकांच्या चुकांमुळे काही शेतकऱ्यांनी चार हेक्टरवर विमा संरक्षण घेतले. परंतु जिल्ह्यातील सुमारे ४२५ शेतकऱ्यांना परतावेच मिळालेले नाहीत.

या योजनेत एक खातेदार किंवा एका नावाने फक्त कमाल चार हेक्टर क्षेत्रासाठीच केळी पिकासाठी विमा संरक्षण घेण्याची अट आहे.

परंतु एका कुटुंबातील तीन चार जणांचे क्षेत्र वेगळे आणि कर्जखाते एकच असल्याने त्यांचा पीकविमा हप्ता एकाच नावाने विमा कंपनीच्या पोर्टलवर बँकांनी भरला. ही चूक बँकांची आहे. भादली (ता.जळगाव) येथील एका शेतकऱ्याबाबत असा प्रकार घडला आहे.

सावदा (ता.रावेर) येथील एका शेतकरी दांपत्याच्या नावावर चार हेक्टर चार आर एवढे क्षेत्र आहे. या क्षेत्रातील केळी पिकासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या नातेवाईकाने सीएससीमधून पीकविमा योजनेत विमा हप्ता भरून सहभाग घेतला.

परंतु या शेतकऱ्यालादेखील चार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रासाठी विमा संरक्षण घेतल्याने विमा परतावा विमा कंपनी, शासनाकडे तक्रारी करूनही मिळालेला नाही.

Crop Insurance
Ajit Pawar : नाफेडची कांदा खेरदी ताबडतोब सुरू करा; अजित पवार मुख्यमंत्र्यांशी बोलणार

नको त्या तक्रारींवर शासनाची तत्परता

फळ पीकविमा योजनेत जिओ टॅगींग व इतर बाबींवर आलेल्या तक्रारींची दखल शासनाने घेतली. चौकशी सुरू केली. जिओ टॅगींग सुरू केले. परंतु परतावे मिळत नसल्याच्या तक्रारींकडे लक्ष द्यायला वेळ नाही. नको तेथे तात्पर्य आणि हव्या त्या वेळी नामनिराळे होण्याचा प्रकार प्रशासन, शासन करीत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

विमा कंपनीचे शासनाला पत्र

विमा कंपनीने आपल्याकडील चार हेक्टरवरील क्षेत्रासासाठी केळीसंबंधी विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारी व शेतकऱ्यांचे मुद्दे याबाबत कृषी विभाग, कृषी आयुक्तालय किंवा शासनाला माहिती दिली. परंतु शासनाने दखल घेतलेली नाही.

यामुळे हा प्रश्न रेंगाळला आहे. संबंधित शेतकऱ्यांचे विमा परतावे केंद्राकडूनच मंजूर झालेले नाहीत,अशी माहिती विमा कंपनीच्या सूत्रांनी दिली.

शेतकऱ्यांची तडजोडीची तयारी

चार हेक्टरवर केळी पिकासाठी विमा संरक्षण घेतल्याने अटीचा भंग केल्याचे दिसत असले तरी यात शासनाने तडजोड करावी. चार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राचा उर्वरित विमा हप्ता शासनाने जमा करावा, परंतु कमाल चार हेक्टर क्षेत्रासाठी विमा परतावे दिले जावेत, अशी मागणी शेतकरी धनंजय चौधरी (सावदा, ता.रावेर, जि.जळगाव) यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com