
किल्ल्ले धारूर : तालुक्यात मागील दोन वर्षांपासून मिरचीची लागवड (Chilli Cultivation) मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात पाण्याची उपलब्धता अत्यल्प प्रमाणात आहे. मात्र याच कमीअधिक पाण्यामध्ये येथील शेतकरी आधुनिकतेची कास धरत तंत्रज्ञानाचा वापर करून ठिबक सिंचनाद्वारे मोठ्या प्रमाणात मिरची लागवड करत आहेत.
येथील मिरचीला इतर मिरचीच्या तुलनेत बाजारपेठेत मोठी मागणी असून भावसुद्धा जास्तीचा मिळत असल्याने शेतकरी यातून उत्पन्न मिळवत आहेत. यामुळे यावर्षी तालुक्यात दोनशे एकरच्या जवळपास सिमला व हिरवी मिरची लागवड झाली आहे.
मागील काही वर्षापासून बदलत्या वातावरणामुळे कधी अतिवृष्टी, गारपीट तर कधी दुष्काळ यामुळे शेतकरी पुरता होरपळून निघत आहे.
शेतीवर केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी कर्जबााजारी होत असून आत्महत्याचेही प्रमाण वाढले आहे. मात्र आता हे चित्र बदलत आहे. तालुक्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेती करत आहेत.
काही वर्षांपासून सिमला मिरची व हिरवी मिरचीचे क्षेत्र वाढले असून एकरात सिमला मिरची किंवा हिरवी मिरचीतून शेतकरी सरासरी दोन तीन लाख रुपये मिळवत आहेत. यामुळे तालुका मिरची हब म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.