
Sindhudurag Crop Damage : जिल्ह्यात वन्यप्राण्यांकडून (Wild Animal Rampage ) फळपिकांसह भातपीक, नाचणी (Ragi) आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Crop Damage) होत आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय आणि नुकसानभरपाई (Crop Damage Compensation) संदर्भात सकारात्मक निर्णय घ्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी राज्य समितीकडे केली.
वन्यप्राणी आणि पक्ष्यांकडून होणाऱ्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शासनाने गठित केलेली राज्य समिती जिल्ह्यात दाखल झाली.
प्रधानसचिव आणि चार आमदारांच्या समितीतील मुख्य वनंरक्षक आर. एम. रामानुजन, दापोली विद्यापीठाचे डॉ. योगेश परूळेकर, डॉ. प्रकाश क्षीरसागर, डॉ. विनायक पाटील, अमृत शिदे, मदन क्षीरसागर या सदस्यांनी जिल्ह्यातील माणगाव (ता. कुडाळ) खोऱ्यातील शेती आणि बागायतीची पाहणी केली. या वेळी समितीने प्रगतिशील शेतकरी दादा बेळणेकर यांच्या शेतीनुकसानीची पाहणी केली.
या वेळी बेळणेकर यांनी जिल्ह्यात नारळ, काजू, आंबा, फणस, केळी, पेरू, बांबू, अननस, सुपारी, कोकम, सीताफळ, भात, नाचणी, कुळीथ, उडीद, वाल, चवळी, भुईमूग, ऊस, मका, सोयाबीन, ज्वारी, सूर्यफुल, पाम आदी पिके घेतात.
या पिकांचे रानडुक्कर, माकड, केडली, गवा, नीलगाई, मोर, साळींदर, शेकरू, गिधाड, कोल्हा या प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होते. नुकसानभरपाईबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी शेतकऱ्यांच्या वतीने केली.
या वेळी सदस्यांनी नुकसानीसंदर्भातील अहवाल शासनाला सादर करून अधिकाधिक सकारात्मक निर्णय होतील, अशी ग्वाही दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.