
Jalgaon News : खानदेशात नंदुरबार, शहादा, जळगावमधील जळगाव, अमळनेर, चाळीसगाव, धुळ्यातील धुळे व शिरपूर या बाजार समित्यांच्या निवडणुकीसंबंधी (APMC Election) कार्यकर्त्यांनी दाखल केलेले अर्ज मागे घेण्यासंबंधी नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. कार्यकर्ते माघारीसाठी तयार नाहीत. यामुळे नेत्यांची दमछाक होत आहे.
जळगाव, अमळनेर, चाळीसगाव, धुळे येथे तिरंगी लढत होईल, असे दिसत आहे. महाविकास आघाडीमधील घटक पक्ष आणि युतीमधील सेना-भाजपमधील नाराज मंडळी एकत्र येवू लागली आहे. या मंडळीचे स्वतंत्र पॅनेल तयार होऊन निवडणुका तिरंगी होतील, असे दिसत आहे.
येत्या गुरुवारपर्यंत (ता. २०) माघार करायची आहे. परंतु अपेक्षित कार्यकर्त्यांनी माघार न घेतल्याने नेत्यांकडून पॅनेलची घोषणा रखडली आहे.
प्रचार होऊ शकत नाही. कारण कुणालाच आपल्या उमेदवारीची खात्री नाही. नेते आदेश देतील, तेव्हाच प्रचार करू, मेळाव्यासाठी तयारी करू आणि निधी गोळा करू, अशी भूमिका काही उमेदवारांनी घेतली आहे.
अशात माघारीसाठी जळगाव, चाळीसगाव, धुळ्यात महाविकास आघाडी व युतीमधील नेत्यांची दमछाक होत आहे. अर्ज दाखल केले काही कार्यकर्ते गावाला जायचे असल्याचे सांगून निघून गेले आहेत.
ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या आश्वासनावर त्यांचे समाधान होत नसल्याचे दिसत आहे. यामुळे पॅनेलमध्ये कुणाची वर्णी लागेल, हेदेखील निश्चित नाही. जातीय समीकरणे तयार करून पॅनेल उभे करावे लागेल. पण ही समीकरणेदेखील काही नाराज कार्यकर्त्यांमुळे जुळत नसल्याची स्थिती आहे.
जळगाव ग्रामीण व धरणगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर पॅनल निश्चितीचे आव्हान आहे. त्यात गुंतागुंत अधिक असल्याने स्थानिक पदाधिकारी, माजी सभापती व इतर नेत्यांकडे ही जबाबदारी त्यांनी सोपविली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.