
राज्यातील शेतकऱ्यांना पीकविमा १ रुपयामध्ये पीकविमा काढता येणार आहे. आधीच्या योजनेत विमा हप्त्याच्या २ टक्के रक्कम शेतकरी भरत होते.
प्रीमियम भरण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो.
अर्थसंकल्पातील नवीन तरतुदी नुसार शेतकऱ्यांवर विम्याच्या हप्त्याचा भार राहणार नाही.
राज्य सरकार विम्याच्या हप्त्याचा भार उचलणार आहे, अशी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
यासाठी राज्य सरकार ३ हजार ३१२ कोटी रुपयांचा भार उचलणार आहे. त्यामुळे शेतकरी आता १ रुपयांमध्ये पीक विमा काढू शकतात.
राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता.९) राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला.
शिंदे शिवसेना आणि भाजप सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना सरकारकडून अपेक्षा आहेत.
अर्थसंकल्पात शेती आणि शेतकऱ्यांवर विशेष भर देण्यात आला आहे.
शाश्वत शेती आणि समृद्ध शेतकरी टॅगलाइनखाली शेतकऱ्यांसाठी विविध योजनाची घोषणा करण्यात आली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.