
Akola News : कांद्याला दर मिळत नसल्याने राज्यातील उत्पादक कमालीचा अडचणीत आलेला आहे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे हे दर (Onion Rate) पडले असून मातीमोल भावाने शेतकऱ्यांना आपला माल विकण्याशिवाय पर्याय आलेला नाही. याचा निषेध करण्यासाठी होळीच्या दिवशी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Collector's Office) कांद्याची होळी करत निषेध नोंदवला.
अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी शेतकरी संघटनेचे अविनाश नाकट, विलास ताथोड, बळीराम पांडव, यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या धोरणाविरुद्ध घोषणाबाजी केली. यावेळी चार पोते कांदयाची होळी पेटवण्यात आली.
सरकारने घेतलेल्या भूमिकेमुळे आज कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याचा आरोप यावेळी अविनाश नाकट यांनी केला. तर सरकारने तातडीने आपल्या धोरणात बदल करून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव कसा मिळेल, असे धोरण घेण्याची मागणी विलास ताथोड यांनी केली.
सरकारने तातडीने शेतकऱ्यांचा कांदा योग्य त्या भावाने खरेदी करावा अशी आवाहन यावेळी पांडव यांनी केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.