
Satara News : ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेणाऱ्या शरद पवारांनीच सहकारात गढ्या निर्माण करून त्यांच्या सरदारांनी गावगाड्यातील शेतकऱ्यांची लूट केली.
यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे दमदार नेतृत्व आहे, असे मी यशवंतरावांच्या समाधीच्या साक्षीने सांगतो. फडणवीसच महाराष्ट्रातून पवारशाही नष्ट करून लुटारूंचा बंदोबस्त करू शकतात, अशी टीका रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली.
येथील प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळास अभिवादन करून कऱ्हाड ते सातारा ‘वारी शेतकऱ्यांची’ पदयात्रेस सोमवारी प्रारंभ करण्यात आला. यादरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे, जिल्हा उपाध्यक्ष मुसद्दीक आंबेकरी, बापूराव जगदाळे, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
श्री. खोत म्हणाले, ‘‘कऱ्हाडमधून साताऱ्यापर्यंत आम्ही गावगाड्याचे प्रश्न घेऊन पदयात्रा काढत असून, या तीन दिवसांत सरकार आमच्या मागण्यांकडे लक्ष देईल, अशी आशा आहे. तीन दिवसांत निर्णय झाला नाही तर आम्ही वाहनाने मुंबईला मंत्रालयावर धडक मारणार आहोत.
मंत्रिपद मिळवायला नव्हे; तर शेतकऱ्यांना न्याय मिळविण्यासाठी आलो आहोत. शेतकऱ्यांना पारतंत्र्यात ठेवणारे काँग्रेसने केलेले कायदे संपुष्टात आणा, शेतकऱ्यांना स्वातंत्र्य द्या, अशी आमची सरकारला मागणी आहे.’’
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.