
२०१४ मधील ६८ लाख मेट्रिक टन धानाचे उत्पादन (Paddy Production) २०२२ मध्ये २.४९ कोटी मेट्रिक टन इतके वाढले आहे. तेलंगणा हे शेतकऱ्यांना गुंतवणूकीसाठी आर्थिक मदत देणारे एकमेव राज्य आहे. रयथू बंधू (Rayatu Bandhu) योजने अंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ६५ हजार कोटी रुपये जमा झाले आहेत, अशी माहिती तेलंगणा राज्याचे अर्थमंत्री हरीश राव (Harish Rao) यांनी दिली. ते बुधवारी (ता.५) तेलंगणा कृषी अधिकारी संघ दिनदर्शिका आणि डायरीचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी तेलंगणाचे कृषी मंत्री निरंजन रेड्डी उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले, "३६ हजार कोटी रुपयांची गुंतवणुक ऊर्जा आणि पायाभूत सुविधा विकासासाठी करण्यात आली. आणि कृषी क्षेत्रासाठी १०,५०० कोटी रुपये वर्षाला खर्च करून चोवीस तास वीज पुरवली जात आहे. "
रयथू बंधू या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना कृषी निविष्ठेसाठी तेलंगणा सरकार दरवर्षी दोन टप्प्यात १० हजार रुपयांची मदत देते. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सरकारने या योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा केल्याची माहिती दिली आहे.
"कलेश्वरम प्रकल्पामुळे तेलंगणाचा चेहरामोहरा चांगलाच बदलला आहे. तसेच तेलंगणा राज्य शेजारील राज्यांना तांदूळ निर्यात करण्यास प्रोत्साहित करत आहे. तेलंगणा राज्याच्या निर्मितीनंतर लगेचच मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या सूचना घेतल्या आणि त्यावर आधारित पोलिसांची रचना केली. विस्तार अधिकारी मोठ्या संख्येने नियुक्त करण्यात आले," असेही अर्थमंत्री हरीश राव यांनी मेळाव्यात सांगितले.
कृषीमंत्री रेड्डी म्हणाले, "जमिनीच्या आरोग्याचे रक्षण करण्याच्या गरजेवर भर देण्याची गरज आहे. राज्यातील परिस्थिती लक्षणीयरीत्या सुधारल्यामुळे परदेशात शिकलेले आणि स्थायिक झालेले अनेक लोक शेती करण्यासाठी राज्यात परत येत आहेत. लवकरच नवीन क्लस्टर्स स्थापन करण्यात येणार आहे."
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.