
Washim News : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या वादळी पावसामुळे (Stormy Rain) रब्बी पिकांसह (Rabi Crop) फळबागांचे नुकसान (Orchard Damage) झाले.
या भागात संत्रा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले असून मदत (Crop Damage Compensation) मिळण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
झालेल्या नुकसानाचे पंचनामे केलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत लवकर द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहेत.
या भागात ६ मार्चला वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने संत्रा पिकाचे नुकसान झाले. तोडणीसाठी आलेली संत्रा फळे जमिनीवर पडली. यामुळे संत्रा उत्पादकांवर मोठे संकट ओढावले आहे.
मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार कृषी सहायक व तलाठ्यांकडून पंचनामे करण्यात आले आहेत. तरी प्रशासनाने आम्हा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत द्यावी, अशी मागणी संत्रा उत्पादक भगवान भांदुर्गे यांनी केली आहे.
या भागात इतरही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. काढणीला आलेला गहू जमिनीवर लोळला तर हरभरा पिकाचेही नुकसान झाले आहे. या सर्वच शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी केली जात आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.