
Akoala News : हवामान बदलाच्या (Climate Change) काळात शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी केल्याचे परिणाम दिसून येत आहेत.
बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा या गावात विविध घटकांचा थेट शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्याची जबाबदारी कृषी यंत्रणेने घेतली. त्यामुळे गावात फळबाग, शेडनेट, सूक्ष्म सिंचन, यंत्र, अवजारांचा लाभ घेतलेले शेतकरी शेतीत फायदेशीर ठरू लागले.
राज्यातील १५ जिल्ह्यांत २०१८ पासून नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पाचा पहिला पाच वर्षांचा कालावधी जवळपास पूर्णत्वास आल्याने शासनाने आता दुसऱ्या टप्प्यालाही मंजुरी दिली आहे.
पहिल्या टप्प्यांत काही ठिकाणी चांगली कामे झाली आहेत. प्रामुख्याने राजंदासारख्या छोट्या गावात विविध घटकांचा लाभ देण्यात आल्याने शेतकऱ्यांना फायदा झाल्याचे भेटीदरम्यान दिसून आले. या गावात कृषी यांत्रिकीकरणाचा २२ शेतकऱ्यांना लाभ दिल्या गेला.
चार शेतकऱ्यांनी रेशीम शेती सुरू केली. २५ हेक्टरवर प्रकल्पातून फळबाग उभी राहिली. २८४ जणांनी सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेतला. दोघांनी शेतीपूरक डाळ मिलचा व्यवसाय थाटला. तर एका शेतकऱ्याने शेडनेट उभारून त्यात सिमला मिरचीचे उत्पादन सुरू केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.