शहरटाकळी, ता. नगर ः रखरखत्या उन्हाची तमा न बाळगता शेतकऱ्यांनी खरीपपूर्व मशागतीला सुरुवात केली आहे. खरीप हंगामाचा कालावधी जवळ आला आहे. मात्र यंदा इंधन दरवाढीने शेतीकामाचा खर्च वाढला आहे. त्यामुळे शेतकरी शेतीच्या मशागतीसाठी बैलांना प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.
खरीप हंगामाच्या तयारीला नगर जिल्ह्यात वेग आला आहे. शेतातील नांगरणी, वखरणी, सरी, रोटा मारणे अशा विविध कामांत शेतकरी गुंतून गेले आहेत. शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी, दहिगाव-ने परिसरातील शेतकरी वर्षांतून दोन पिके घेऊ लागला आहे. त्यामुळे शेतातील ऊस, कांदा उत्पादनाचा आलेख उंचावला होता. मात्र दोन वर्षांपूर्वी कोरोना महामारीमुळे शेतामधील माल कमी दराने विकण्याची वेळ आली. त्यामुळे बळिराजाच्या आर्थिक संकटांमध्ये वाढ झाली होती. अशा परिस्थितीमध्ये शेतीसाठी आर्थिक नियोजन कसे करावे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
या वर्षी समाधानकारक पाऊस होणार असल्याच्या हवामान खात्याच्या अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. बैलांची संख्या कमी झाल्यामुळे शेतीची कामे ट्रॅक्टरच्या साह्याने केली जातात. शेती व्यवसायातही यांत्रिकीकरण झाले. मात्र इंधन दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतीच्या सर्वच कामांचा खर्च वाढला आहे. त्यामुळे शेतकरी यंदा बैलाच्या साह्याने शेतीकामाला प्राधान्य देत आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.