
Palghar News : जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जलजीवन मिशनची (Jaljeevan Mission) कामे सुरू आहेत. शिवाय जागेअभावी अद्याप अनेक ठिकाणी कामे सुरू झालेली नाहीत.
त्यामुळे सरपंच (Sarpanch), ग्रामसेवक (Gramsevak) व कनिष्ठ अभियंता यांनी अशा कामांची माहिती घेऊन सात दिवसांत त्यातील तांत्रिक अडचणी दूर करून काम सुरू करण्यात यावे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकार अधिकारी रवींद्र शिंदे यांनी सूचित केले.
जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी वाडा व विक्रमगड तालुक्यातील जलजीवन मिशनमधील प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासाठी सरपंच व ग्रामसेवक यांच्यासमवेत पालघर जिल्हा कार्यालयात बैठक आयोजित केली होती.
या बैठकीमध्ये कार्यकारी अभियंता गंगाधर निवडुंगे, वाडा व विक्रमगड तालुक्यातील उपअभियंता व सर्व कनिष्ठ अभियंता यांच्यामार्फत प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला.
सरपंचांकडून आपापल्या भागातील अडचणी जाणून घेऊन शिंदे यांनी ग्रामसेवक व संबंधित अभियंत्यांना मार्गदर्शनपर सूचना केल्या.
ज्या गावांनी वन अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केले आहेत त्या गावच्या सरपंच व ग्रामसेवक यांनी वनविभाग कार्यालय येथे संपर्क साधावा. तसेच गटविकास अधिकारी यांना सोबत घेऊन संबंधित जागेची पाहणी करण्यात यावी.
वनविभागाची एनओसी घेऊन नळयोजना लवकरात लवकर सुरू करण्यात याव्यात. असेही रवींद्र शिंदे यांनी सांगितले.
कुडूस गावासाठी सभा आयोजित करावी
कुडूस येथे नळ पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्याकरिता कार्यकारी अभियंता, उपअभियंता तसेच गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायतीमध्ये जाऊन सभा आयोजित करावी.
तसेच डोंगस्ते येथील कंपनीच्या जागेमध्ये टाकीचे काम करण्यासाठी उपअभियंता व गटविकास अधिकारी यांनी सभा आयोजित करून संबंधित प्रश्न मार्गी लावून लवकरात लवकर कामे सुरू करावी, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या बैठकीदरम्यान दिले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.