
Akola Protest News : कृषी विभागातील (Agriculture Department) अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटीबाबत घेतलेल्या अन्यायकारक भूमिकेचा निषेध करीत जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन (Agriculture Officials Protest) केले.
महाराष्ट्र राज्य कृषिसेवा महासंघाने के. पी. बक्षी वेतन त्रुटी निवारण समितीने कृषी विभागावर केलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता. ३) धरणे आंदोलन जाहीर केले होते.
यामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मुरली इंगळे, आत्मा प्रकल्प संचालक आरिफ शाह, एसडीओ के. बी. खोत, उपसंचालक संध्या करवा, तंत्र अधिकारी ज्योती चोरे, शेंडे, प्रशासन अधिकारी प्रशांत देशमुख, तालुका कृषी अधिकारी शशिकिरण जांभरूणकर, विलास वाशीमकर, कृषी अधिकारी विठ्ठल गोरे, संजय अटक, महादेव राऊत यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.
कृषी विभाग राष्ट्रीय कृषी विकास योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, पिकावरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, स्मार्ट प्रकल्प, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना, मग्रारोहयो, पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना, पीकविमा योजना अशा योजना राबवत आहे.
किंबहुना सर्व योजनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी कृषी विभागाने केली आहे. केंद्र शासनाने २०१६-१७ मधील अन्नधान्य उत्पादनातील कार्यासाठी राज्यास ‘कृषी कर्मण पुरस्कार’, जलयुक्त शिवार अभियानाच्या कार्यासाठी २०१८-१९ मध्ये केंद्र शासनाने राज्याचा ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ देऊन गौरव केला.
तसेच २०२२ या वर्षाकरिता ‘महापरवाना’ या ऑनलाइन प्रणालीस स्कॉच संस्थेचे ‘रौप्य पदक’ जाहीर झाले आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.