
Yavatmal News : अडाण नदीपात्रात गेल्या ३० जानेवारीपासून पाणी (Water) सोडण्यात आले नाही. त्यामुळे रब्बी हंगामातील (Rabi Season) हरभरा (Chana) पीक धोक्यात आले आहे. तत्काळ पाणी न सोडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा घाटंजी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून दिला आहे.
घाटंजी तालुक्यातील अडाण नदीपात्रात पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे नदीपात्रात पाण्याचा ठणठणाट आहे. पाण्याअभावी कोळी, चिंचोली, किन्ही, निबर्डा येथील रब्बी पीक धोक्यात आले आहे.
येत्या दोन- तीन दिवसांत पाणी न सोडल्यास शेतकऱ्यांचे उभे पीक वाळून नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.
नदीपात्रात पाणी सोडल्यास सिंचनासह जनावरांना पिण्यासाठी पाण्याची सोय होईल, याकडे दुर्लक्ष केल्यास सहकुटुंब उपोषणाला बसून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी निवेदनातून दिला आहे.
या वेळी मनोज राठोड, कैलास चव्हाण, नितीन डफडे, सचिन देशमुख, नेताजी राठोड, मधुकर जुनघरे, महादेव सिडाम, विष्णू बावरू, प्रदीप पवार, राहुल मोहजे, मनोज सल्लार, आकाश राठोड, गणेश देशमुख, खुशाल राठोड, पद्माकर डफडे आदी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.