Sugar Factory : सातारा जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांकडून नियमांचे उल्लंघन

सध्या मार्चअखेर असल्याने पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, टॅक्ट्ररसाठी काढलेले कर्ज, घरासाठी काढलेले कर्ज यांचे हप्ते भरावे लागणार आहेत.
Sugar Factory
Sugar FactoryAgrowon

Sugarcane Crushing Season : सातारा ‘जिल्ह्यातील गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, ऊस लवकर तुटावा यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहे. याचा जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांकडून गैरफायदा घेतला जात आहे.

ऊस तुटल्यावर १४ दिवसांत पहिली उचल देणे बंधनकारक असतानाही शेतकऱ्यांना एक ते दोन महिन्यांनी बिले जमा केली जात आहेत. तक्रार केल्यावर ऊस ठेवला जाईल किंवा तोडण्यास विलंब केला जाईल या भीतीने शेतकरी गप्प राहात आहेत.

Sugar Factory
Sugarcane Labor Insurance : दहा लाख ऊसतोड कामगारांना पाच लाखांचे विमा संरक्षण

जिल्ह्यातील गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून गाळपाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी साखर कारखान्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. उष्णतेत झालेल्या वाढीमुळे पाण्याची कमतरता भासू लागली आहे तसेच मार्च महिन्यांच्या अगोदर बिल जमा व्हावे यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहेत.

शेतकऱ्यांच्या या असहायतेचा गैरफायदा घेतला जात आहे. ऊस तोडला जात आहे मात्र बिल जमा करण्यात दिरंगाई केली जात आहे. अनेक कारखान्यांकडे एक ते दोन महिन्यांनी जमा करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

सध्या मार्चअखेर असल्याने पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, टॅक्ट्ररसाठी काढलेले कर्ज, घरासाठी काढलेले कर्ज यांचे हप्ते भरावे लागणार आहेत.

मात्र कारखानदारांच्या आडमुठ्या धोरणांमुळे शेतकऱ्यांनी कर्ज, हप्ते भरणे शक्य होणार नसल्याने कर्जाचा बोजा सोसावा लागण्याची वेळ आली. आपलेच पैसे आपल्याच उपयोगी येत नसल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी आहे.

Sugar Factory
Sugar Production : राज्यात पुढील वर्षी उसासह साखर उत्पादन वाढणार

‘‘चौदा दिवसांत बिल देण्याचा कायदा महाविकास आघाडी शासनाने रद्द केला होता. हा कायदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन करून पूर्ववत केला आहे. या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे मार्चअखेर पैसे भरता येत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहेत.

साखर आयुक्त कायदा मोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाईचे धाडस करीत नसल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. सहकारमंत्र्यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांना १४ दिवसांत ऊस बिल जमा करण्याचे आदेश द्यावेत,’’ असे स्वाभिमानी संघटनेेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके म्हणाले.

‘अजिंक्यतारा’कडून मिळते दहा दिवसांत बिल

जिल्ह्यातील अनेक कारखान्यांना १४ दिवसांत ऊस बिल देण्याचे उल्लंघन आहे. मात्र अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना याला अपवाद आहे.

या कारखान्यांकडून ऊस तुटल्यापासून १४ दिवसांऐवजी अवघ्या दहा दिवसांत ऊस बिल जमा करीत आहे. यामुळे या कारखान्यास ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांना नियोजन करणे शक्य होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com