Jalyukta Shivar Abhiyan : ‘जलयुक्त शिवार’अंतर्गत २३१ गावांची निवड

जलयुक्त शिवार अभियान दोन अंतर्गत पाणलोट क्षेत्राच्या विकासासाठी जिल्ह्यातील २३१ गावांची निवड करण्यात आली आहे.
Jalyukta Shivar
Jalyukta ShivarAgrowon

Nashik News : जलयुक्त शिवार अभियान (Jalyukta Shivar Abhiyan) दोन अंतर्गत पाणलोट क्षेत्राच्या विकासासाठी जिल्ह्यातील २३१ गावांची निवड करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार अभियान टप्पा २.० अंतर्गत गावकऱ्यांच्या सहभागाने कामांचे नियोजन करण्यात यावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. १०) डॉ. पवार यांच्या अध्यक्षतेखाली जलयुक्त शिवार अभियान, गोदावरी प्रदूषण नियंत्रण व पावसामुळे पिकांचे नुकसान व पंचनामे याबाबत आढावा बैठका झाल्या. त्या वेळी त्या बोलत होत्या.

महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्शल नेहते, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते, उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Jalyukta Shivar
Onion Rate news: कांद्याच्या प्रश्नावरून केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार आणि शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची

डॉ. पवार म्हणाल्या, की जलयुक्त शिवार अभियान प्रथम टप्पा, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, आदर्श गाव व इतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत पूर्ण झालेली, तसेच कार्यान्वित असलेली गावे वगळून उर्वरित गावांपैकी काही गावांचा यात समावेश करण्यात आला आहे.

नदीप्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना आवश्यक

गोदावरी नदी प्रदूषण रोखण्यासाठी शहरात अमृत योजनेतून तपोवन, टाकळी येथे मलनिस्सारण केंद्र उभारले जाणार आहेत.

अमृत एक योजनेतून ८२ कोटी खर्चून काम झाले, तर अमृत दोनच्या टप्प्यात आयआयटी पवई आणि महापालिकेच्या विद्यमाने टाकळी आणि तपोवन येथे अनुक्रमे १६६ आणि १२८ कोटी रुपये खर्चून मलनिस्सारण केंद्राचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.

Jalyukta Shivar
Onion Cultivation In Parbhani : परभणी जिल्ह्यात ७९७ हेक्टरवर कांदा लागवड

त्यासाठी अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठविण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदूषण मंडळामार्फत ज्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीचे सांडपाणी नदीत मिसळते, त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात येत आहे.

यासोबतच प्लॅस्टिक बंदीबाबतदेखील जनजागृती करण्यात यावी. जेणेकरून नदी प्रदूषणामुळे येणाऱ्या पिढ्यांना असलेला धोका लक्षात घेऊन संबंधित विभागांनी नदीप्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही डॉ. भारती पवार यांनी दिल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com