
Akola News : गेले चार-पाच दिवस तयार झालेले ढगाळ वातावरण (Cloudy Weather), अवकाळी पाऊस आता थोडाफार ओसरल्याने बाजार समित्यांमध्ये पुन्हा शेतीमाल विक्रीची लगबग वाढण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने अवकाळी पावसाबाबात इशारा दिल्यानंतर बाजार समित्यांनी शेतीमाल विक्रीस आणण्याबात शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे गेल्या आठवड्यात आवक अत्यंत कमी झाली.
सध्या बाजारात नवीन तूर, हरभरा तसेच सोयाबीन विक्रीसाठी शेतकरी गर्दी करीत आहेत. प्रामुख्याने गेल्या आठवड्याआधी अकोला बाजार समितीत नवीन हरभऱ्याची आवक सातत्याने पाच हजार पोत्यांपर्यंत राहली होती. तुरीचीही आवक हजार पोत्यांवर व्हायची.
वातावरण खराब झाल्यानंतर मालाची आवक बरीच कमी झाली. या भागात तीन दिवस अधून-मधून पावसाने हजेरी ही. सोमवारी (ता. २०) पाऊस ओसरल्याचे चिन्ह दिसत होते.
ढगाळ वातावरण बऱ्याच अंशी निवळले होते. यामुळे बाजार पुन्हा जोमाने सुरू होण्याची प्रतीक्षा करीत असलेले शेतकरी शेतीमाल घेऊन येण्यास सुरुवात झाली.
हवामान खात्याच्या नागपूर येथील प्रादेशिक कार्यालयाने २२ मार्चपासून कुठलाही इशारा नसल्याने स्पष्ट केले आहे. यामुळे सर्वच बाजार समित्यांत शेतीमाल आवक सुधारण्याची शक्यता आहे.
हमीभावाने ८००० क्विंटल खरेदी
आधारभूत किमतीने शेतीमाल खरेदीसाठी जिल्ह्यात पणन विभागाने सुरू केलेल्या केंद्रावर आतापर्यंत ८००० क्विंटल हरभरा खरेदी झाली आहे. १६ मार्चपासून बहुतांश केंद्रे सुरू झाली होती. दरम्यान दोन दिवस पाऊस आल्याने खरेदी प्रक्रिया विस्कळीत झाली.
आता पावसाची शक्यता कमी झाल्याने पुन्हा एकदा ही केंद्रे कार्यरत होऊन हरभरा खरेदीला वेग येईल, अशी शक्यता पणन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.