
Parbhani News : शेती व शेतकऱ्यांसाठी (Agriculture Budget) भरीव तरतूद नसल्यामुळे राज्य सरकारच्या २०२३-२४ अर्थसंकल्पाच्या प्रतीची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Sanghtana) वतीने शुक्रवारी (ता. १०) परभणी येथे होळी करण्यात आली.
सोयाबीन, कापुस, कांदा, हरभरा या हातात आलेल्या पिकांचे भाव राज्य व केंद्र सरकारच्या धोरणामुळे दिवसेंदिवस पडत चालले आहेत.
सध्या असलेल्या बाजार भावाप्रमाणे उत्पादन खर्च भरून निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमाल घरात साठून ठेवला आहे.
या अर्थसंकल्पात शेती आणि शेतकऱ्यांकरिता भरीव अशी तरतूद असायला पाहिजे होती. मात्र हा अर्थसंकल्पा शेतीवर अमृत वर्षाव करणारा आहे हे भासवत आहेत.
शेतीचे खरे प्रश्न बाजूला ठेवल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे या अर्थसंकल्पाच्या प्रतीची होळी करण्यात आली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, गजानन तुरे, केशव आरमळ, माऊली लोडे, प्रसाद गरुड, कृष्णा शिंदे, मुंजाभाऊ लोडे, मोकिद वावरे, उद्धव जवंजाळ, सुधाकर खटिंग, बाळासाहेब ढगे, रामप्रसाद शिंदे, शिवराज अवचार, अमोल देशमुख, ज्ञानेश्वर बुरूड, माऊली शिंदे आदी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.