
Aurangabad Farmers Protest : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Sanghatana) वतीने बुधवारी पैठण शहरातील पैठण- शेवगाव रोडवरील शहागड नाका (कमान) येथे चक्का जाम आंदोलन (Farmer Agitation) करण्यात आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी शेतकरी पक्ष यांच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पैठण येथे १३ फेब्रुवारीला खा. राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती.
या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्य व केंद्र सरकार उदासीन असून शेतकरी विरोधी असल्याचे अनेक पदाधिकारी यांनी आपले मत मांडले. त्यामुळे त्या बैठकीत सर्वानुमते राज्यव्यापी आंदोलनाची भूमिका सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकमताने मांडली होती.
या बैठकीत मागण्यांवर राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बुधवारी (ता. २२) पैठण शहरातील पैठण- शेवगाव रोडवरील शहागड नाका (कमान) येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात माऊली पाटील मुळे संतोष पाटील तांबे, सुखदेव लबडे, शरद म्हस्के, अरुण म्हस्के, गणेश भुजबळ, यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
...या आहेत प्रमुख मागण्या
१) कापूसाला १२५०० रुपये, मकाला२५०० रुपये, सोयाबीनला ८००० रुपये प्रति क्विंटल किमान भाव स्थिर राहावा यासाठी केंद्र सरकारने तत्काळ धोरणे आखावी.
२) अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदत तत्काळ देण्यात यावी.
३) सोयापेंड (डिओसी) व कापूस तसेच सूत निर्यातीला प्रोत्साहन द्या.
४) कापसाची आयात थांबवावी. सोयापेंड आयात करणार नाही, हे केंद्राने स्पष्ट करावे.
५) सक्तीची वीज वसुली व वीज दरवाढ थांबविण्यात यावी. व शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज पुरवठा करावा.
६) मागील वर्षीचा व चालू वर्षीचा १०० टक्के पीक विमा देण्यासाठी विमा कंपन्यांना आदेशित करावे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.