नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या (Center Government) धान खरेदी धोरणातील भेदभावाच्या निषेधार्थ तेलंगणातील सत्ताधारी टीआरएस (TRS) पक्षाच्या वतीने दिल्लीत सोमवारी एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पक्षाचे सर्व मंत्री, खासदार, आमदार तसेच विधान परिषदेचे सदस्य तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधी सहभागी झाले होते.
केंद्र सरकारने (Center Government) तेलंगणामधील शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यास नकार दिला असून सरकारच्या या भेदभावाच्या धोरणामुळे राज्यातील ६१ लाख शेतकरी कुटुंबे (Farmer Family)प्रभावित झाली आहेत. त्यामुळे सरकारने तातडीने या शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने धान खरेदी सुरू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. धान खरेदी धोरणात समानता आणावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. दिल्लीतील तेलंगणा भवन येथे आंदोलन करण्यात आले. काही दिवसांपूर्वी टीआरएस (TRS) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तेलंगणामध्ये (Telangana) राष्ट्रीय महामार्ग रोखला होता. यावेळी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी आमदार के कविता यांनी यावेळी धान खरेदी धोरणातील भेदभावावरून केंद्र सरकारवर (Government) टीका करत यामुळे देशात धोकादायक स्थिती निर्माण होईल, असे म्हटले होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.