
Rice Farming : रसायनी परिसरात खरिपाच्या हंगामातील (Kharif Season) भातकापणीनंतर सिंचनाचा आधार असलेले शेतकरी दुबार भात आणि भाजीपाल्यांचे पीक (vegetable crop) घेत आहेत. दोन-तीन वर्षांपासून या दुबार पिकाला हवामान बदलाचा फटका बसू लागल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत.
त्यात आता गावातील आणि रानातील डुकरे; तसेच मोकाट जनावरांचाही पिकाला धोका वाढला आहे. शेतकऱ्यांना पिकाच्या संरक्षणासाठी शेतावर राखण करत बसावे लागत आहे.
परिसरातील वासांबे मोहोपाडा, आपटे, गुळसुंदे, चावणे, वडगाव पंचक्रोशीतील शेतकरी खरिपाच्या हंगामात भाताचे पीक घेत आहे. कापणीनंतर दुबार कडधान्याचे पीक घेतात.
याशिवाय सिंचनाचा आधार असलेले शेतकरी दुबार भात आणि भाजीपाल्याच्या पिकाची लागवड करतात.
चार-पाच वर्षांपासून वादळ, अतिवृष्टी, परतीचा आणि अवकाळी पाऊस; तसेच वळवाच्या पावसाचा फटका बसत असल्याने खरीप आणि रब्बीच्या हंगामात पिकाचे नुकसान होत आहे. परिणामी, शेतकरी पुरतेच हतबल झाले असून आर्थिक संकटात सापडले आहेत.
दरम्यान, परिसरात दाट लोकवस्ती असलेल्या गावातील डुकरे दुबार भात आणि भाजीपाला पिकांचे नुकसान करत आहे. डोंगरालगत असलेल्या शेतातही रानातील डुकरे, गुरे घुसून लोळत असतात. ही गुरे-जनावरे पीक खाऊन पायाखाली तुडवत असतात.
यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना दिवस रात्र शेतावर राखण करत बसावे लागत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.