Nanded Tapman News : जिल्ह्यात किमान तापमानाचा पारा पुन्हा एकदा सरासरी तापमानाच्या खाली आला आहे. मंगळवारी (ता. १४) सकाळी साडेआठ वाजता किमान तापमान (temperature) १३.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले.
यामुळे सकाळी हुडहुडी भरलेल्या अनेकांना दुपारनंतर मात्र उन्हाचे चटके बसत आहेत. कमाल तापमानही ३२ अंशांवर पोहोचले आहे.
जिल्ह्यात सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. रब्बीतील हरभरा, गहू, रब्बी ज्वारी, करडई, धने यांसारख्या पिकांची काढणी सुरू आहे. अशाचत मागील काही दिवसांपासून सकाळी कमालीचा गारवा जाणवत आहे.
यामुळे शेतीकामाला जाण्यासाठी वेळ होत आहे. तर दुपारी मात्र कडक उन्ह पडत असल्याने शेतकऱ्यांना सावलीचा सहारा घ्यावा लागत आहे. मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात किमान तापमानाचा पारा वीस अंशांपेक्षा खाली आला आहे.
मंगळवारी (ता. १४) सकाळी साडेआठ वाजता किमान तापमान १३.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. तर कमाल तापमान ३२.८ नोंदले गेले. किमान तापमानात घट झाल्याने सकाळी कडाक्याची थंडी जाणवत आहे. परिणामी शेतकऱ्यांना शेकोट्या पेटवाव्या लागत आहे.
दरम्यान, दुपारी मात्र पारा चढल्याने उन्हाचे चटके बसत आहेत. अशा थंड-गरम वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम जाणवत आहे. अनेकांना सर्दीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
जिल्ह्यात सोमवारी (ता. १३) रोजी किमान तापमान १६.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. तर रविवारी (ता. १२) १६.२ अंश सेल्सिअस, शनिवारी (ता. ११) १५.६ अंश सेल्सिअस, शुक्रवारी (ता. १०) १५.२ अंश सेल्सिअस, गुरुवारी (ता.९) १५.२ अंश सेल्सिअस, बुधवारी (ता. ८) १६.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.