Group Farming : भविष्यात शेती, शेतकरी वाचविण्यासाठी गटशेतीची गरज

Group Farming Update : देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी व नंतरही देशात अन्नधान्याची तीव्र टंचाई होती. त्यामुळे देशातील ३५ कोटी नागरिकांची अन्नधान्याची व्यवस्था कशी करायची, या विवंचनेत तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी होत्या.
Group Farming
Group Farming Agrowon

Nashik News : ‘‘देशात १९६० नंतर झालेल्या हरितक्रांतीने शेतकऱ्यांत आत्मनिर्भरता, सुबत्ता आली. देश आज बहुसंख्य कृषी उत्पादनांमध्ये स्वयंपूर्ण झाला असला तरी पाण्याची घटती उपलब्धता, जमिनीची घसरलेली सुपीकता, पिकांना भाव नाही, जमिनीचे छोटे तुकडे व शेतीसाठी मजुरांचा अभाव आदी प्रश्‍न शेतकऱ्यांपुढे उभे राहिले आहेत.

यावर मात करून बळीराजाच्या उन्नतीसाठी भविष्यात गटशेती हाच उत्तम पर्याय असेल,’’ असे ठाम मत कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी यांनी मांडले.

बुधवारी (ता. १०) नाशिक शहरातील गंगाघाटावरील देवमामलेदार यशवंतराव महाराज पटांगणावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेतील दिवंगत प्रा. सुरेश मेणे स्मृती व्याख्यानात ‘भविष्यातील भारतीय शेती’ वर डॉ. मायी बोलत होते.

डॉ. मायी म्हणाले, ‘‘देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी व नंतरही देशात अन्नधान्याची तीव्र टंचाई होती. त्यामुळे देशातील ३५ कोटी नागरिकांची अन्नधान्याची व्यवस्था कशी करायची, या विवंचनेत तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी होत्या.

मात्र त्यानंतरच्या हरितक्रांतीने खऱ्या अर्थाने देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला. परंतु नंतरच्या काळात शेतीक्षेत्रात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे भविष्यात शेतकरी व शेती वाचविण्यासाठी गटशेतीशिवाय पर्याय नाही.’’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com