
Solapur News : पिकविलेल्या शेतमालाला योग्य बाजारभाव (Bajarbhav) मिळत नाही, सतत हवामान बदलाचा (Change Weather) परिणाम उत्पन्नावर होतो आहे, त्यातच उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच वीज वितरण कंपनीने थकबाकी वसुलीसाठी शेतीपंपाची वीज (Electricity) तोडण्याची मोहीम सुरू केली आहे.
कोणतेही सरकार येऊ द्या, ते शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसते, हाच अनुभव शेतकरी सध्या घेत आहेत. शेतीपंपाचे वीज कनेक्शन बंद केले जात असतानाच शेतकऱ्यांबरोबरच गावठाणातील वीज ग्राहकही यामध्ये भरडला जात असून, महावितरणाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
हिवाळ्याबरोबरच उन्हाळाही जोर धरू लागला आहे. त्यामुळे पिकांना पाण्याची गरज असतानाच वीज कनेक्शन बंद केले जात आहेत.
त्यामुळे उभी पिके धोक्यात आली आहेत. करमाळा तालुक्याच्या उजनी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या वीजबिल थकबाकीच्या कारणामुळे शेतीपंपाचा वीजपुरवठा महावितरणकडून खंडित केलेला आहे.
वीजपुरवठा खंडित केल्यानंतर गावठाण शेजारी शेतकरी तारांवर आकडे टाकून शेतीपंप सुरू करत आहेत. त्यामुळे गाव डीपीवर ताण वाढून ट्रान्सफॉर्मर जळण्याचा धोका निर्माण झाला आहे. दिवसभरात गावठाणातील वीज वारंवार खंडित होत असल्याने ग्रामस्थ वैतागून गेले आहेत.
करमाळा तालुक्यातील शेतीपंपाचा वीजपुरवठा पूर्ववत करावा तसेच वीजतोडणी त्वरित बंद करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. अजित विघ्ने यांनी केली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.