Nashik News : तालुक्यातील माळवाडी ग्रामस्थांनी एकत्र येत उद्वेगातून ‘गाव विकणे आहे’चा ठराव केल्यानंतर मंगळवारी (ता. ७) निवासी नायब तहसीलदार विजय बनसोडे यांनी गावाला भेट देऊन उपस्थित शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व शासन दरबारी पाठविण्याचे आश्वासन दिले.
कांद्यासह इतर शेतीमालाला भाव नसल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे आहे. यामुळे शेती व्यवसाय करणे जिकिरीचे बनल्याने तालुक्यातील माळवाडी येथील शेतकऱ्यांनी चक्क गावच विकायला काढण्याचा निर्णय घेत तसा ठरावच केला.
त्यानंतर निवासी नायब तहसीलदार विजय बनसोडे यांनी भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत निवेदन स्वीकारले. फुले माळवाडीचे सरपंच हिरामण शेवाळे, माळवाडीचे शिवाजी बागूल, अविनाश बागूल, अमोल बागूल, अक्षय शेवाळे, शहाणा बागूल, गणू बागूल, प्रवीण बागूल, महेंद्र बागूल, किशोर बागूल, बाळासाहेब बागूल, राकेश सोनवणे, राजू बच्छाव, तलाठी अमोल येशी, संजय बागूल, अनिल गोसावी आदी उपस्थित होते.
‘ॲग्रोवन’ने परिस्थिती आणली समोर
कोणत्याही शेतमालाला भाव मिळत नसल्याच्या निषेधार्थ माळवाडी ग्रामस्थांनी गावातील सभामंडपात एकत्र जमत संपूर्ण गावच शासनाला विकण्याचा ठराव केला.
यामुळे कांद्यासह इतर शेतीमालाच्या भावाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. याबाबतची परिस्थिती ‘सकाळ’-‘ॲग्रोवन’ने परिस्थिती समोर आणली होती.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.