Sharad Pawar On Onion : कांदा प्रश्न राज्य सरकार नीट हातळत नाही; पवारांनी टोचले शिंदे-फडणवीसांचे कान

राज्यात कांद्याचे दर पडलेले आहेत. शेतकऱ्यांचा कांदा असाच पडलेला आहे. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांनी कांदा फेकून दिला आहे.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon

कांदा प्रश्नी राज्य आणि केंद्र सरकार योग्य निर्णय घेत नाही.

सध्याचं जे शिंदे-फडणवीस सरकार आहे, ते यासंबंधी करतो करतो म्हणतात, पण प्रत्यक्षात काहीही करत नाहीत, अशी टीका शरद पवार यांनी राज्य सरकारवर केली.

कांद्याच्या प्रश्नावर ते शनिवारी (ता.४) बारामतीत पत्रकारांशी बोलत होते.

राज्यातील कांद्याचे दर पडल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.

त्याचे पडसाद विधिमंडळातही पाहायला मिळाले. मात्र सरकार अजून कांदा प्रश्न गांभीर्याने घेत नसल्याचे मत पवारांनी व्यक्त केले.

पवार पुढे म्हणाले, "राज्यात कांद्याचे दर पडलेले आहेत. शेतकऱ्यांचा कांदा असाच पडलेला आहे. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांनी कांदा फेकून दिला आहे.

राज्यात अतिशय वाईट परिस्थिती आहे. आम्ही सत्तेत असतानाही कांदा प्रश्न निर्माण झाला होता. पण तेव्हा आम्ही कांदा खरेदी केला.

नाफेडला कांदा खरेदी करायला लावला. त्यातून मोठा आर्थिक बोजा उचलला. त्यामुळे कांद्याचा प्रश्नातून मार्ग काढला."

सध्याचे शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत गंभीर नाही. राज्यात भाजीपाला कांद्याचे दर पडले आहेत.

मात्र राज्य सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे, अशी खंतही पवारांनी व्यक्त केली.

राज्यातील पोटनिवडणुकांच्या निकालावरही पवारांनी यावेळी भाष्य केले. देशातील चित्र बदलत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत.

राज्य सरकारने नाफेडची खरेदी वाढवावी व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com