
पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातो. पारंपारिक पद्धतीत बदल करुन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आता वाढू लागला आहे. यामध्ये नवीन पिकांच्या जाती विकसित करण्यावर शास्त्रज्ञांचा भर असतो. वाराणसी येथील भाजीपाला संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी एकाच झाडाला वांगी, टोमॅटो आणि बटाटे उत्पादित करण्याची किमया साधली आहे. कलम तंत्राचा वापर करुन हे साध्य झाले आहे. आतापर्यंत केवळ झाडांमध्ये कलम तंत्राचा (Vegetable Grafting) वापर केला जायचा. पण हे तंत्र आता भाजीपाला पिकामध्येही वापरले जात आहे.
कलम करताना रुटस्टॉक म्हणून वांग्याच्या रोगप्रतीकारक रोपाची निवड केली आहे.
रोपवाटीकेमध्ये २४ ते २८ अंश सेल्सिअस तापमानाला ८५ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रतेमध्ये ही कलमे वाढवली.
कलम केलेल्या रोपांची १५ ते २० दिवसांनी शेतात लागवड करण्यात आली. योग्य प्रमाणात खत, पाणी आणि रोपांची छाटणी केल्यानंतर या रोपांपासून ६० ते ७० दिवसांनी फळे मीळायला सुरुवात होते.
या रोपांना जमिनीखाली मुळावर बटाटे आणि खोडाच्यावर टोमॅटो लागतात ज्याला पोमंटो असे नाव देण्यात आले आहे.
एकाच झाडापासून ३ कीलो वांगी आणि २ किलो टोमॅटो मिळतात.
भाजीपाला पिकामध्ये कलम तंत्राचा वापर २०१३ -१४ मध्ये सुरू झाला. ज्या ठिकाणी जागा कमी आहे याशिवाय ज्यांना बाजारातील रासायनिक अवशेषयुक्त भाज्या खायच्या नाहीत त्यांच्यासाठी हे तंत्र फायदेशीर ठरु शकेल असे संस्थेचे संचालक डॉ जगदीश सिंह म्हणाले. टेरेस गार्डनची आवड असलेल्या लोकांसाठी ही कलमी रोपे शहरी भागातील नर्सरी व्यावसायीकांना प्रशिक्षण देऊन देण्यात येतील. जेणेकरून सामान्य लोकांना ही रोपे मिळतील.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.