Water Level : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाणीपातळी सुस्थितीत

जिल्ह्यात मागील तीन चार वर्षांपासून पाऊस चांगला होतो आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणीपातळीही वाढ झाली आहे.
Ground Water Level
Ground Water Level Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : जिल्ह्यातील सर्व ९ तालुक्यांतील भूजल पातळी (Groundwater Level) सप्टेंबर २०२२ ते ३१ जानेवारी २०२३ या चार महिन्यांत झालेल्या सर्वेक्षणात ८.६१ वरून ८.८१ मीटरवर गेली आहे.

जानेवारी अखेरच्या निरीक्षणानुसार सोयगाव तालुक्यात किंचित असलेली घट वगळता इतर तालुक्यातील भूजल पातळी मात्र अजूनही सुस्थितीत दिसते आहे.

जिल्ह्यात मागील तीन चार वर्षांपासून पाऊस चांगला होतो आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणीपातळीही वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील भूजल पातळी आताच्या घडीला किती आहे, वर्षभरात भूजल स्थिती कशी राहील, याचा अंदाज घेण्यासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून जिल्ह्यातील ९ तालुक्यात १४१ निरीक्षण विहिरी निश्‍चित करण्यात आलेल्या आहेत.

त्या सर्व विहिरींचे वर्षातून चारवेळा निरीक्षण नोंदवले जाते. पावसाळा संपल्यानंतर सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील या निरीक्षण विहिरींचे सर्वेक्षण करण्यात आल्यानंतर पाण्याच्या टंचाई बाबत संभाव्य अहवाल जाहीर केला जातो.

Ground Water Level
‘उजनी’ची पाणीपातळी पोहोचली ८० टक्क्यांवर

तुलनात्मक अभ्यासात जिल्ह्यातील औरंगाबाद तालुका वगळता सर्व तालुक्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत पर्जन्यमानात वाढ झालेली दिसून आली होती.

पर्जन्यमानाच्या तुलनेत वाढ झालेल्या आठ तालुक्यांपैकी एका तालुक्यात १० टक्केपर्यंत, दोन तालुक्यात १० ते २० टक्क्यांपर्यंत आणि पाच तालुक्यात २० ते ५० टक्क्यांपर्यंत पर्जन्यमानात वाढ आढळून आली होती.

याशिवाय पाच वर्षाच्या सरासरी भूजल पातळीच्या तुलनेत १४१ विहिरीच्या निरीक्षणात १.६० मीटरने वाढच दिसून आली होती.

जानेवारी २०२३ अखेर तालुकानिहाय भूजलपातळी (मीटरमध्ये)

तालुका भूजल पातळी

छत्रपती संभाजीनगर - ८

गंगापूर - ९.७६

कन्नड - ९.४१

खुलताबाद - ९.९३

पैठण - ९.९

फुलंब्री - ७.८६

सिल्लोड - ८.४७

सोयगाव - ५.६

वैजापूर - १०.३३

सरासरी - ८.८१

Ground Water Level
Water Shortage : जालना जिल्ह्यातील ५१४ गावांना पाणीटंचाईचा धोका
भूजल पातळीत वाढ होण्यासाठी शेतकर्‍यांनी विहिरीच्या बाजूने खड्डा खोदून त्यामधील पाणी विहिरीत सोडावे. शेताच्या बाजूला बांध टाकून पाणी अडवावे. नागरिकांनी छतावरील पाणी एकत्रित जमा होईल, अशी तरतूद करावी. जलस्रोत बघून पाण्याची बचत तथा उपसा कसा कमी होईल, याकडे लक्ष द्यावे.
प्रकाश शेलार, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, छत्रपती संभाजीनगर
पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असल्याने त्याचा अपव्यय होणार नाही, याची काळजी घ्यावी. भूजलपातळी वाढण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन पाणीसाठ्यानुसार पीक नियोजन करणे गरजेचे आहे.
डॉ. कैलास आहेर, सहायक भूवैज्ञानिक, छत्रपती संभाजीनगर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com