
Chhatrapati Sambhajinagar : जिल्ह्यातील सर्व ९ तालुक्यांतील भूजल पातळी (Groundwater Level) सप्टेंबर २०२२ ते ३१ जानेवारी २०२३ या चार महिन्यांत झालेल्या सर्वेक्षणात ८.६१ वरून ८.८१ मीटरवर गेली आहे.
जानेवारी अखेरच्या निरीक्षणानुसार सोयगाव तालुक्यात किंचित असलेली घट वगळता इतर तालुक्यातील भूजल पातळी मात्र अजूनही सुस्थितीत दिसते आहे.
जिल्ह्यात मागील तीन चार वर्षांपासून पाऊस चांगला होतो आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणीपातळीही वाढ झाली आहे.
जिल्ह्यातील भूजल पातळी आताच्या घडीला किती आहे, वर्षभरात भूजल स्थिती कशी राहील, याचा अंदाज घेण्यासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून जिल्ह्यातील ९ तालुक्यात १४१ निरीक्षण विहिरी निश्चित करण्यात आलेल्या आहेत.
त्या सर्व विहिरींचे वर्षातून चारवेळा निरीक्षण नोंदवले जाते. पावसाळा संपल्यानंतर सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील या निरीक्षण विहिरींचे सर्वेक्षण करण्यात आल्यानंतर पाण्याच्या टंचाई बाबत संभाव्य अहवाल जाहीर केला जातो.
तुलनात्मक अभ्यासात जिल्ह्यातील औरंगाबाद तालुका वगळता सर्व तालुक्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत पर्जन्यमानात वाढ झालेली दिसून आली होती.
पर्जन्यमानाच्या तुलनेत वाढ झालेल्या आठ तालुक्यांपैकी एका तालुक्यात १० टक्केपर्यंत, दोन तालुक्यात १० ते २० टक्क्यांपर्यंत आणि पाच तालुक्यात २० ते ५० टक्क्यांपर्यंत पर्जन्यमानात वाढ आढळून आली होती.
याशिवाय पाच वर्षाच्या सरासरी भूजल पातळीच्या तुलनेत १४१ विहिरीच्या निरीक्षणात १.६० मीटरने वाढच दिसून आली होती.
जानेवारी २०२३ अखेर तालुकानिहाय भूजलपातळी (मीटरमध्ये)
तालुका भूजल पातळी
छत्रपती संभाजीनगर - ८
गंगापूर - ९.७६
कन्नड - ९.४१
खुलताबाद - ९.९३
पैठण - ९.९
फुलंब्री - ७.८६
सिल्लोड - ८.४७
सोयगाव - ५.६
वैजापूर - १०.३३
सरासरी - ८.८१
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.