
"राज्यातील पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. शेतकऱ्यांचे सरकार आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना पूर्णत: मदत केली जाईल," असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांनी कुटुंबियांसोबत होळी आणि धूळवड साजरी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या.
"पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासन नक्कीच शेतकऱ्यांना मदत करेल. बळीराजाचं सरकार आहे.
त्यामुळे शेतकऱ्याला सरकार कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही," असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्र्यांना राज्यातील कांद्याच्या दरावरही प्रश्न विचारण्यात आला. परंतू मुख्यमंत्र्यांनी त्यावर बोलणे टाळले.
"नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंचनामे झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मदतीसंबंधी निर्णय घेतील," अशी प्रतिक्रिया राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तारांनी दिली.
राज्यात गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. गहू, कांदा, द्राक्ष, हरभरा पिकांना फटका बसला आहे.
ऐन होळीच्या सणाच्या दिवशी राज्यातील शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे.
दरम्यान, सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.