Union Budget 2023: निर्मला सीतारामन अर्थसंकल्पात शेती क्षेत्राला बळ देणार का?

शेती क्षेत्राच्या दृष्टीने एक सकारात्म बाब म्हणजे रब्बी पिकांच्या पेरण्यांची स्थिती समाधानकारक आहे. खरीप पिकांच्या काढणीमुळे शेतकऱ्यांकडील पैशांचा पुरवठा वाढला.
Nirmala Sitaraman
Nirmala SitaramanAgrowon

Union Budget 2023: एक तारखेला सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2023) हा आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा (Loksabha Election) शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असेल.

या अर्थसंकल्पात शेती आणि ग्रामीण अर्थकारणाला (Rural And Agriculture Economy) बळ मिळावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

गेल्या दोन वर्षांपासून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेत धुगधुगी आणायची असेल तर ग्रामीण अर्थव्यवस्था जोमाने वाढणे आवश्‍यक आहे.

त्यामुळे या अर्थसंकल्पात शेती आणि ग्रामीण अर्थकारणावर विशेष भर दिला जावा, अशी जाणकारांची अपेक्षा आहे.  

गेल्या दोन वर्षांत खालील कारणांमुळे शेती क्षेत्रावरील अरिष्ट अधिक गडद झालेः

  • शेती निविष्ठांच्या किंमती भडकल्या. विशेषतः रशिया-युक्रेन युध्दामुळे किंमती आभाळाला भिडल्या. गेल्या वीस महिन्यांत शेती निविष्ठा महागाईचा दर दोन आकडी राहिला आहे. डिसेंबर २०२२ मध्ये तो २०.३ टक्क्यावर आला, परंतु जून २०२२ मध्ये तो ३८.५ टक्क्यावर पोहोचला होता.

  • ग्रामीण महागाईचा दर सातत्याने शहरी महागाईपेक्षा जास्त राहिला आहे.

  • ग्रामीण भागातील शेती आणि बिगर शेती क्षेत्रातील मजुरी गेल्या वर्षभरात कमी राहिलेली आहे.

  • हवामानातील टोकाच्या बदलांमुळे पिकांच्या उत्पादनावर विपरित परिणाम झाला. २०२२ च्या सुरूवातीला उष्णतेच्या लाटेमुळे गहू पिकाचे मोठे नुकसान झाले. जुलै २०२२ मध्ये मॉन्सूनच्या संथ वाटचालीमुळे खरीप पिकांच्या पेरण्यांना उशीर झाला. ऑक्टोबर २०२२ मध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे नाशवंत शेतीमालाचे नुकसान झाले.

  • कोव्हिडमुळे ग्रामीण रोजगारावर मोठा परिणाम झाला.

  • कोव्हिडच्या काळात सरकारतर्फे राबवल्या गेलेल्या कल्याणकारी योजना २०२३ मध्ये बंद होतील. उदा. केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजना बंद करण्याचा निर्णय नुकताच घेतला.

सकारात्मक बाब
शेती क्षेत्राच्या दृष्टीने एक सकारात्म बाब म्हणजे रब्बी पिकांच्या पेरण्यांची स्थिती समाधानकारक आहे. खरीप पिकांच्या काढणीमुळे शेतकऱ्यांकडील पैशांचा पुरवठा वाढला. परंतु जीडीपीमध्ये वाटा वाढण्यासाठी ग्रामीण अर्थव्यवस्थेला भरभक्कम स्टिम्युलन्ट पॅकेज मिळण्याची आवश्‍यकता आहे.

अर्थसंकल्पाकडून अपेक्षा
यंदाच्या अर्थसंकल्पात पुढील बाबींसाठी भरभक्कम तरतुदी करण्याची आवश्‍यकता आहेः  

  • ग्रामविकासाच्या विविध योजनांसाठी भरीव तरतूद

  • शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार

  • शेतीविषयक पायाभूत सुविधांसाठी वाढती गुंतवणूक

वरील बाबींकडे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विशेष लक्ष दिले तरच ग्रामीण अर्थव्यवस्थेचं गाडं गाळातून बाहेर पडेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com