
केळीची वाळलेली पाने (रोगविरहित), उसाचे पाचट, गव्हाचा अथवा सोयाबीन भुसा यांचा वापर आच्छादनासाठी करावा किंवा दोन ओळीतील मोकळ्या जागेत ३० मायक्रोन जाड चंदेरी काळ्या रंगाचे पॉलिइथिलिन पेपर अंथरावा. यामुळे जमिनीतून होणाऱ्या पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. उन्हाळ्यातील अधिक तापमान व अल्प आर्द्रता यांचा संयुक्तरीत्या केळीच्या झाडावर विपरीत परिणाम होतो. केळी पीक ३५ अंश सेल्सिअसपर्यंतचे तापमान सहन करू शकते. तापमान ३८ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यास प्रकाशसंश्लेषण क्रिया मंदावते. दुपारच्या तीव्र सूर्यप्रकाशामुळे झाडांची पाने पिवळी पडून वाळतात.
निसवलेल्या घडांतील वरील बाजूच्या फण्यातील केळी तीव्र प्रकाशामुळे काळी पडतात. तापमान ४५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक वाढल्यास जमिनीतील पाण्याचा अंश बाष्पीभवनामुळे कमी होतो. अशा वेळी पाणीपुरवठा न केल्यास मुळे कमकुवत होतात, काही वेळा झाडे उन्मळून पडतात. सद्यःस्थितीत मृगबाग ही घड पक्वता आणि कांदेबाग मुख्य वाढीच्या अवस्थेत असून निसवणीला सुरुवात होईल. हे लक्षात घेऊन उन्हाळ्यात केळी बागेचे योग्य व्यवस्थापन करावे. व्यवस्थापनातील प्रमुख बाबी
संपर्क- प्रा. एन.बी. शेख, ०२५७-२२५०९८६ (केळी संशोधन केंद्र, जळगाव)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.