
हिंगोली : सद्यःस्थितीत हिंगोली जिल्ह्यात पेरणीयोग्य झालेला नाही. किमान १०० मि.मी. पाऊस होईपर्यंत. जमिनीमध्ये पुरेशा प्रमाणात ओल उपलब्ध होईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ३ लाख ५३ हजार ६२४ हेक्टर प्रस्तावित पेरणी क्षेत्र आहे. आजपर्यंत जिल्ह्यात ५५ हजार ४०३ टन रासायनिक खते उपलब्ध झाली आहेत. त्यापैकी ३४ हजार मेट्रिक टन रासायनिक खतांची विक्री झाली. २५ हजारांवर टन खतांचा साठा शिल्लक आहे. शेतकऱ्यांनी केवळ डीएपी खताची मागणी करू नये.
त्यातही विशिष्ट उत्पादकांच्या डीएपीसाठी आग्रह धरू नये. वास्तविक पाहता सर्व कंपन्यांच्या डीएपीमध्ये १८ टक्के नत्र व ४६ टक्के स्फुरद हेच घटक उपलब्ध असतात. सोयाबीन पिकांसाठी एनपीकेएस २० ः२० ः०० ः १३ या ग्रेडचे खत अतिशय उपयुक्त आहे. कारण त्यामध्ये सोयाबीन बियाण्यांमध्ये तेलाचे प्रमाण वाढविण्यासाठी आवश्यक असलेले सल्फर (गंधक) १३ टक्के आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी डीएपी ऐवजी एनपीकेएस २० ः २० ः०० ः१३ या ग्रेडच्या खताचा सोयाबीनसाठी वापर करावा.
तसेच युरिया अधिक सुपर फॉस्फेट या दोन ग्रेडची खते डीएपी खताला उत्तम पर्याय असून, त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो. एसएसपी (सिंगल सुपर फॉस्फेट) मध्ये सल्फर (गंधक) असल्याने सोयाबीन बियाणातील तेलाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. त्यामुळे या खताचा वापर सोयाबीन या पिकासाठी शेतकऱ्यांनी करावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.