
Nashik News : वादळी वाऱ्यासह पावसामुळे निफाड तालुक्यातील द्राक्ष व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे (Crop Damage Survey) करून तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे, अशी महिती आमदार बनकर (MLA Bankar) यांनी दिली.
गत पंधरवड्यात झालेल्या वादळी पावसाच्या नुकसानीतून शेतकरी अद्याप सावरलेले नसताना रविवारी (ता. ९) व सोमवारी (ता. १०) सायंकाळी निफाड तालुक्यातील चांदोरी, चितेगाव खेरवाडी, सुकेणे, दिक्षी आदी गावांसह अनेक भागांत झालेल्या पावसाने काढणीला आलेल्या अनेक द्राक्ष बागा भुईसपाट होऊन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
या द्राक्ष बागांची आमदार बनकर यांनी पाहणी केली. महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले.
वादळी पावसामुळे चांदोरी येथील प्रवीण कोरडे, संजय कोरडे, विष्णू कोरडे, बाळासाहेब आहेर, संजय भोज, विष्णू सोनवणे, सुरेश गडाख, सोमनाथ लोंढे, विष्णू गायखे, भाऊसाहेब खर्डे तर खेरवाडी येथील गणेश गायखे, दिक्षी येथील देविदास चौधरी, भाऊसाहेब चौधरी आदी शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा जमीनदोस्त झाल्या.
द्राक्षे योग्य दरात, तत्काळ काढणी करावी
नुकत्याच झालेल्या वादळी पावसाचा फटका निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक बसला असून द्राक्ष व्यापारी, बेदाणा उत्पादक, वाईन उत्पादक यांना शेतकऱ्यांच्या बांधावरून फोन करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची द्राक्षे योग्य दरात व तत्काळ काढणी करावी, असे आवाहन बनकर यांनी द्राक्ष व्यापारी, बेदाणा उत्पादक, वाईन उत्पादक यांना केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.