कर्जमाफीचा पुन्हा बॅंकांनाच फायदा ः बच्चू कडू

बच्चू कडू
बच्चू कडू

सोलापूर ःशेतकऱ्यांना द्यावयाच्या कर्जमाफीचा सर्वाधिक फायदा पुन्हा एकदा बॅंकांना झाला. शेतकरी कर्जमुक्त झाले नाहीत, उलट बॅंका मात्र मजबूत झाल्या, असा आरोप प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केले. दिव्यांगांच्या निधी वितरणाबाबत आढावा घेण्यासाठी आमदार कडू सोलापुरात आले होते. ते म्हणाले, की मुद्रा लोनच्या माध्यमातून फक्त भाजपच्या लोकांना कर्ज दिले गेले. एकाही सामान्य रोजगाराला कर्ज मिळाले नाही. सोलापुरातील एखादे उदाहरण सांगा, की गरिबाला मुद्रा लोनच्या माध्यमातून कर्ज मिळाले आहे. तसे असल्यास ते उदाहरण मी सर्व राज्यभर देईन. कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्याला कमी बॅंकेला जास्त झाला आहे. बॅंकांवर सरकारचे नियंत्रणच नाही. सगळ्यांची मिलीजुली आहे. शेतकरी मेला काय, जगला काय, त्याचे काही सोयरसूतक या शासनाला नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांबाबत निर्णय न झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जगातील सर्वांत मोठा पुतळा यवतमाळमध्ये उभारण्यात येईल. सहकारमंत्र्यांच्या घराचा विषय अधिवेशनात मांडणार सहकारमंत्र्याच्या बंगल्यासंदर्भात कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते काहीच बोलत नाहीत, या संदर्भात विचारले असता ते म्हणाले, भाजपचा डीएनए तपासला तर त्यांच्यात अर्ध्यांवर कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसचेच नेते दिसतील. पूर्ण भाजप आता राहिलाच नाही. हे सगळे भाऊ भाऊ आहेत. सामान्य जनतेवर महापालिका कारवाई करते. मात्र, सहकारमंत्र्याच्या बंगल्याकडे दुर्लक्ष केले जाते. या बंगल्यासंदर्भात कारवाई करण्याच्या निष्कर्षापर्यंत महापालिका पोचेल असे वाटत नाही. त्यामुळे याप्रकरणी पावसाळी अधिवेशनात आवाज उठवणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com