हमीभावाने शेतमाल विक्रीचा अधिकार द्या : कृषिमूल्य आयोग

हमीभाव
हमीभाव

नवी दिल्ली ः सरकारने बुधवारी (ता.४) खरिपातील १४ पिकांसाठी हमीभाव जाहीर केला आहे. त्यात उत्पादन खर्चाच्या दीडपट वाढ केली असल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. मात्र केवळ हमीभाव जाहीर करून उपयोग नाही, तर शेतकऱ्याला हमीभावाने शेतमाल विक्रीचा अधिकार देण्यासाठी कायदा करावा, अशी सूचना केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने सरकारला केली आहे. सरकार दरवर्षी खरिप आणि रब्बी हंगामातील पिकांसाठी हमीभाव जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देते. केंद्रातील मोदी सरकारने उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. तसेच २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असल्याचेही म्हटले आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी (ता.४) केंद्राने खरिपातील १४ पिकांचे हमीभाव जाहीर करून हे भाव उत्पादन खर्चाच्या दीडपट असल्याचा दावा केला आहे. परंतु केवळ हमीभाव जाहीर करून त्याचा लाभ शेतकऱ्यांना खरोखरच होतो का, हा एक संशोधनाचा विषय आहे. दरवर्षी निम्म्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांना आपला शेतमाल खुल्या बाजार कमी किमतीने विकावा लागतो. हमीभावाचा लाभ थोड्याच शेतकऱ्यांना होतो. त्यामुळे केवळ हमीभाव जाहीर करून शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत नाही, तर त्यासाठी तो हमीभाव शेतकऱ्यांना मिळावा यासाठी कायदा करण्याची गरज आहे.  केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने म्हटले आहे, की शेतकऱ्यांचा शेतमाल मोठ्या प्रमाणात हमीभावापेक्षा कमी किमतीने बाजारात विक्री होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावाचा मिळेलच याची शाश्वती किंवा विश्वास देण्यासाठी हमीभावाने शेतमाल विक्रीचा अधिकार देण्यासाठी कायदा करण्याची आवश्यकता आहे. कृषिमूल्य आयागाने शिफारस केल्याप्रमाणे सरकारने २०१८-१९ च्या खरिपातील पिकांसाठी दीडपट हमीभाव जाहीर केला आहे. मात्र शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ देणे हे मोठे आवाहन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ मिळण्यासाठी पर्यायी व्यवस्था शेतकऱ्यांसाठी निर्माण करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी मध्य प्रदेश सरकारने सुरू केलेली ‘भावांतर योजना’ आणि ‘बाजार शाश्वती (मार्केट अश्युरन्स स्किम)’ यासारख्या योजना प्रभावी ठरतील.  ग्रामपंचयात पातळीवर खेरदी केंद्रे उघडावीत शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ मिळावा यामध्ये केंद्र, राज्य सरकार आणि खासगी खरेदी संस्थांचा मोठी भूमिका आहे. दुर्गम भागातील शेतकऱ्यांना आपला शेतकमाल विक्रीसाठी बाजार समित्यांची सुविधा उपलब्ध नसते. त्यामुळे या शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्री करण्यासाठी स्थानिक बाजारच एक पर्याय असतो. त्यामुळे तेथील शेतकरी स्थानिक बाजारातच हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल विक्री करतात. अशा ठिकाणी शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ देण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर खरेदी केंद्रे सुरू करावीत, अशी महत्त्वाची सूचनाही कृषिमूल्य आयोगाने केली आहे.   निविष्ठांचे अनुदान डीबीटीने शेतकऱ्यांना द्या शेतकरी मोठ्या प्रमाणात पिकांचे अवशेष जाळतात त्याचा पर्यावरणावर परिणाम होतो. म्हणून सरकारने पीक अवशेषांचे व्यवस्थापन करण्यासाठी यंत्रांच्या वापरासाठी मदत करावी. तसेच बायोमास उत्पादन प्रकल्पापर्यंत पिकांचे अवशेष नेण्यासाठी वाहतुक खर्चही द्यावा. तसेच सरकारने कृषी निविष्ठांचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीने जमा करावे. ज्यामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने शासनाच्या योजनांचा लाभ होईल.  भावांतर आणि बाजार शाश्वती योजना भावांतर योजनेत मध्य प्रदेश सरकार शेतकऱ्यांना हमीभाव आणि बाजारातील सरासरी किंमत यामधील फरक देते. सरासरी किंमत ही शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारात विक्रि झालेला दर शेजारच्या राज्यातील त्या पिकांचा हमीभाव यावरुन ठरते. बाजारातील सरासरी दर हा हमीभावापेक्षा कमी असेल तर सरकार शेतकऱ्यांना दरातील फरक भरपाई म्हणून देते. ही रक्कम थेट शेतकऱ्याच्या बॅॅंक खात्यात जमा होते. बाजार शाश्वती योजनेत जेव्हा शेतमालाचे दर हमीभावापेक्षा कमी होतात तेव्हा राज्य सरकारने खरेदीत उतरून शेतमाल खरेदी करावा. या योजनेत राज्याला जे नुकसान होईल त्याची भरपाई केंद्र देईल, अशी तरतुद आहे.  केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने मांडलेले मुद्दे

  •  सरकारने केवळ हमीभाव जाहिर करुन शेतकऱ्यांना लाभ नाही
  •  हमीभावाने शेतमाल खेरदीसाठी व्यवस्था निर्माण करावी
  •  ‘शेतमाल हमीभावाने विक्रीचा अधिकार’ कायदा करावा
  •  शासनाच्या खेरदी व्यतिरिक्त पर्यायी व्यवस्था असावी
  •  भावांतर योजना आणि बाजार शाश्वती योजना प्रभवी पर्याय. दुर्गम भागात ग्रामपंचायत पातळीवर खरेदीकेंद्रे सुरु करावी
  •  पिक अवशेषांच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांना मदत करावी
  •  कृषी निविष्ठांचे अनुदान डीबीटीने शेतकऱ्यांना द्यावे
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com