बंगळूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या सरकारचा गुरुवार (ता. ५) अर्थसंकल्प सादर करण्यात आला. राज्याचा अर्थसंकल्प कुमारस्वामी यांनी सादर केला. निवडणुकीवेळी शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पहिल्याच अर्थसंकल्पात पूर्ण करत त्यांनी शेतकऱ्यांना तब्बल ३४ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली. डिसेंबर २०१७ पर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंत कर्ज माफ केले जाणार आहे. २०१८-१९ या वर्षासाठीचा राज्याचा अर्थसंकल्प गुरुवारी विधान सौधा येथे सादर करण्यात आला. जेडीएस आणि काँग्रेसचे कुमारस्वामी सरकार सत्तेवर आल्यानंतर या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर झाला. या अर्थसंकल्पात कुमारस्वामींनी विविध महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. ते म्हणाले, निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनानुसार कर्जमाफीची घोषणा राज्य सरकारने केली आहे. राज्याचा हा अर्थसंकल्प ६५०० कोटींचा आहे. शेतकऱ्यांना नव्याने कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. त्या संदर्भात नव्याने खाते उघडण्यासही सांगण्यात येणार आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले, की राज्यातील शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी सरकार देणार आहे. यामध्ये डिसेंबर २०१७ पर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यंतचे कर्ज सरकार माफ करणार आहे. या कर्जमाफीचा राज्यातील चाळीस लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. राज्यातील सरकारी आणि सहकारी क्षेत्रातील नोकरदारांचे कुटूंबीय आणि मागील तीन वर्षे मिळकत कर भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेतून बाहेर ठेवण्यात आले आहे. कर्जामाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना क्लिअरन्स प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्याआधारे त्यांना नविन पिककर्ज मिळेल. अर्थसंकल्पातील मुद्दे
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.