जमीन सुपीकतेविषयी नाशिकला बुधवारी चर्चासत्र

जमीन सुपिकता चर्चासत्र
जमीन सुपिकता चर्चासत्र

नाशिक ः शेती व्यवसाय लाभदायी होण्यासाठी कायम शेतकऱ्यांसोबत राहणाऱ्या, तसेच शेतीचे ज्ञान, तंत्रज्ञान, बाजारातील कल यांबाबतची उपयुक्त माहिती दररोज शेतकऱ्यांपर्यंत पोचवणाऱ्या ‘ॲग्रोवन’च्या वतीने येत्या बुधवारी (ता. २०) नाशिकला ‘जमीन सुपीकता’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले आहे. येथील नेहरू गार्डन नजीकच्या परशुराम सायखेडकर नाट्यगृहात चर्चासत्र सकाळी १० ते दुपारी २ यादरम्यान होईल. यारा फर्टिलायझर्स हे या चर्चासत्राचे प्रस्तुतकर्ते असून, कॅन बायोसिस हे सहप्रायोजक आहेत.  जमिनीचे आरोग्य व पीक पोषण या विषयातील तज्ज्ञ तथा पुणे येथील महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, जमीन सुपीकता या विषयासंबंधी आयुष्यभर काम करीत असलेले कोल्हापूर येथील प्रयोगशील शेतकरी प्रताप चिपळूणकर, तब्बल २४ वर्षे नैसर्गिक शेतीचे यशस्वी प्रयोग करणारे सुभाष शर्मा हे मान्यवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील.  राज्यातील जमिनीचे आरोग्य दिवसेंदिवस ढासळत चालल्याने शेती संकटात आली आहे. हे लक्षात घेऊन ‘ॲग्रोवन’ने हे ‘जमीन सुपीकता वर्ष’ जाहीर केले आहे. त्याअंतर्गत पहिले चर्चासत्र पुण्यात झाले. दुसरे चर्चासत्र जळगावात झाले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला व त्याचबरोबर राज्यात ठिकठिकाणी अशी चर्चासत्रे घेऊन शेतकऱ्यांना या विषयाचे मार्गदर्शन करावे, अशी मागणी विविध भागांतून होऊ लागली आहे. त्यानुसार हे तिसरे चर्चासत्र नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नाशिक येथे होत आहे. राज्यात अन्य ठिकाणीही टप्प्याटप्प्याने, अशी चर्चासत्रे आयोजित केली जाणार आहेत.  नाशिक जिल्ह्यात पिकांची विविधता आहे. कांदा, द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला उत्पादनात नाशिक देशात अग्रेसर आहे. नाशिक भागातील शेतकरी हा आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरात देशात सर्वांत पुढे असून, तो देशातील सर्वात प्रगतिशील मानला जातो. परंतु अलीकडे जमिनीची सुपीकता ढासळत चालली आहे. जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी होत असतानाचा खते व पाण्याचा अनियंत्रित वापर आदी कारणांमुळे कमी उत्पादन, क्षारपड जमिनी, नापिकी अशा समस्या शेतकरी राजासमोर आ वासून उभ्या आहेत. येथील अभ्यासू शेतकरी या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी धडपड करीत आहे. याच पार्श्‍वभूमीवर जमिनीची सुपीकता या विषयावर होणारे चर्चासत्र उपयुक्त ठरणारे असेल.  यापूर्वी ‘ॲग्रोवन''ने पुण्यात वर्धापन दिनानिमित्त जमीन सुपीकता यासंबंधी चर्चासत्राचे यशस्वी आयोजन केले होते. त्यास शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी राजाला जमीन सुपीकता टिकविण्याच्या, वाढविण्याच्या संकल्पना मिळाव्यात या दृष्टीने या चर्चासत्राचे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आयोजन केले आहे. प्रवेश विनामूल्य असणार आहे. चर्चासत्राचे नियोजन असे     चर्चासत्र ः जपाल माती, तर पिकतील मोती       स्थळ ः प.सा. नाट्यगृह, नेहरू गार्डनजवळ, शालिमार, नाशिक.      दिनांक व वेळ ः बुधवार, २० मे २०१८ . सकाळी १० ते दुपारी २ .

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com