साखर कारखान्यांकडे १२ हजार कोटींची थकबाकी

गाळप हंगाम
गाळप हंगाम

लखनौ ः उत्तर प्रदेशात २०१७-१८ च्या हंगामात साखरेचे विक्रमी उत्पादन झाल्यानंतर दर पडल्याने साखर कारखाने अडचणीत आले आहेत. कारखान्यांना शेतकऱ्यांची देणी अवघड होत असल्याने थकबाकीचा आकडा वाढला आहे. काही कारखान्यांनी शेतकऱ्यांना उसाचे हप्ते दिले असले तरीही अद्याप कारखान्यांकडे १२ हजार कोटींची थकबाकी आहे.  गेल्या हंगामात उत्तर प्रदेशात साखरेचे उत्पादन १.२ कोटी टन साखरेचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे कारखान्यांकडे अतिरिक्त साखर पडून असून कारखाने अडचणीत आले आहेत. त्यामुळे अशी स्थिती २०१८-१९ च्या हंगामात होऊ नये यासाठी खासगी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना बांधावर जाऊन कमी ऊस लागवड करावी किंवा काही भागात लागवड करू नये, अशा सूचना केल्या होत्या. पुढच्या हंगामात शेतकऱ्यांनी जास्त ऊस लागवड केल्यास अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण होऊ नये किंवा या उसाचे गाळप केल्यास अतिरिक्त साखरेच्या साठ्यात वाढ होऊ नये यासाठी खासगी साखर कारखाने प्रयत्नशील आहेत. तसेच या कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊस लागवडीसाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी देत असलेल्या सुविधाही कमी केल्या आहेत. यामध्ये खासगी ऊस बेणे, कीटकनाशक आणि इतर कृषी निविष्ठांवरील अनुदाने आणि सवलतीच्या दरात कपात केली आहे.  साखर कारखाने गाळपास ऊस कमी पडू नये यासाठी १६ चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात ऊस विकास कार्यक्रम राबवितात. परिणामी २०१७-१८ च्या हंगामात ऊस लागवड क्षेत्रात २.५ लाख हेक्टरने वाढ होऊन २३ लाख हेक्टरवर ऊस लागवड झाली होती. यात आता पुढील हंगामात एकलाख हेक्टरने वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात मागील पाच वर्षामध्ये ऊस लागवड क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली आहे. यंदा साखर कारखाने अतिरिक्त उत्पादनामुळे अडचणीत आल्याने त्यांनी यंदा ऊस विभागाने सुरु केलेल्या ऊस सर्वेक्षणात सहभागी होण्यास नकार दिला आहे.  ऊस विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे, की पुढील हंगामात ऊस लागवड वाढणार असून हंगामाच्या मध्यातच लोकसभेच्या निवडणुका येणार आहेत. त्यामुळे हा मुद्दा चर्चेत येऊन नये आणि शेतकऱ्यांचा सर्व ऊस गाळपास जावा यासाठी विभाग प्रयत्नशील आहे.  तसेच शेतकऱ्यांच्या सर्व उसाचे गाळप व्हावे यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून जास्तीत जास्त ऊस गाळप व्हावे यासाठी साखर कारखान्यांना आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच गाळप सुरू करण्यास राज्य सरकारने सांगितले आहे.  ऊस न लावण्याचे कारखान्यांचे आवाहन २०१७ च्या हंगामात अतिरिक्त साखर उत्पादन झाल्याने कारखान्यांमध्ये अद्यापही साखर दराअभावी पडून आहे. त्यामुळे पुढच्या हंगामात शेतकऱ्यांनी जास्त ऊस लागवड केल्यास अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे खासगी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊस लागवड न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच साखर कारखाने गाळपास ऊस कमी पडू नये यासाठी १६ चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात ऊस विकास कार्यक्रम राबवितात. या कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊस लागवडीसाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी देत असलेल्या सुविधाही कमी केल्या आहेत. तसेच खासगी ऊस बेणे, कीटकनाशक आणि इतर कृषी निविष्ठांवरील अनुदाने आणि सवलतीच्या दरात कपात केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com